शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

सदाबहार प्रेमाची खुमासदार कहाणी : ‘प्रेमा तुझा रंग कसा ?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:15 IST

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम.

प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीची भुरळ आजही प्रेक्षकांवर कायम आहे, याची प्रचिती आपणास ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा प्रयोग पाहिल्यानंतर येते. प्रा. कानेटकरांची संवादशैली, पात्रांच्या वृत्ती व स्वभावामधून निर्माण होणारे नर्मविनोद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य. फार्स आणि विनोदी पद्धतीने जाणारे हे नाटक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम. प्रेमाला बंधन नसते, निस्सीम प्रेम म्हणजे त्याग व उदात्त समर्पण. नि:स्वार्थी, निरपेक्षपणे केलेलं प्रेम हे चिरकाल टिकणारं असतं. मात्र प्रेमात जेव्हा व्यवहार येतो तेव्हा सुरू होते असूया आणि द्वेष. मानवी जीवनाच्या एका विशिष्ट वळणावर व्यक्तीला केव्हा ना केव्हा प्रेम होतेच. या प्रेमाची परिणिती, त्याचा प्रवास भविष्यामध्ये कशारीतीने होतो याचा नाट्यानुभव म्हणजे ‘प्रेमा तुझा रंग कसा?’. 

प्रा. बल्लाळ (रवींद्र ढवळे) मानसशास्त्र विषयाचे अभ्यासक. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा (निशिगंधा घाणेकर) यांचा २५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलेले असते. यांची दोन मुलं बच्चू (सुयोग कुलकर्णी) आणि बब्बड (भावना भालेराव). नवीन पिढीस कायम असे वाटते की, जुनी पिढी आमचं प्रेम समजूनच घेत नाही. बब्बड व बाजीराव (ऋषीकेश गोटे) यांची देखील हीच अडचण आहे. बच्चू तीन वेळा प्रेमभंग होऊन परत सुशीलच्या (मीरा जोशी) प्रेमात पडतो. सुशील मात्र बच्चूवर विविध मानसशास्त्रीय प्रयोग करत असते. परंतु हे प्रयोग बच्चूस प्रेमच वाटतं. पुढे सुशील सर्जेराव सोबत लग्न करते आणि परत एकदा बच्चूचा प्रेमभंग होतो. 

रवींद्र ढवळे यांनी आपल्या दिग्दर्शनामधून आणि प्रा. बल्लाळ या मुख्य भूमिकेमधून नाटकास वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. प्रियंवदा या भूमिकेमध्ये निशिगंधा घाणेकर यांची भूमिकेची समज खूप छान होती. महेंद्र दीक्षित यांनी रंगवलेला निळूभाऊ हा साठच्या दशकाची पुरेपूर आठवण करून देतो. काळी टोपी, काळा कोट, धोतर आणि काठी यामुळे ह्यनिळूभाऊह्ण हे पात्र अधिक उठावदार झाले. त्यांची अनुनासिक बोलण्याची पद्धत आणि ह्यराम कृष्ण हरीह्ण भाव खाऊन गेले. बच्चू, सुशील, बाजीराव, बब्बड यांनी देखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. 

अमोल काबरा यांनी पार्श्वसंगीतामध्ये प्रसंगानुरूप निवडलेली गाणी रंजकता वाढवणारी होती. नेपथ्यामध्ये अरविंद देशपांडे आणि कैलास डिडवानी यांनी उभे केलेले सुखवस्तू घर, दिवाणखाना व गॅलरी प्रयोगास पूरक होते.

‘प्रेमा तुझा रंग कसा?’ या प्रश्नाचे उत्तर देखील आपणास प्रा. कानेटकरांनी उभ्या केलेल्या पात्रामधून मिळते. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा यांच्या प्रेमाची परिपूर्णता. निळूभाऊ आपल्या पत्नीवर आजारी असून देखील तेवढेच प्रेम करतात ही त्यागीवृत्ती. अवखळ, निरागस असं प्रेम आहे बाजी आणि बब्बड यांचं. एकतर्फी, वारंवार प्रेमभंग होऊन देखील व्यवहारी शहाणपण नसणारा आणि परत प्रेमात पडणारा बच्चू. 

पूर्वी जे घडले तेच आजही घडले आणि आजपासून २५ वर्षांनंतर देखील याच पद्धतीने हे प्रेमाचे रंग असेच आपणासमोर उलगडतील. यातील मुख्य पात्र असतील आपली पुढची पिढी. प्रेमाचा हा उत्कट, तरल, भावपूर्ण, विरह, त्याग, निरपेक्ष, एकतर्फी, विरक्त प्रवास वळणावळणाने जाऊन शेवटी सप्तरंगामध्ये सामावून जातो. प्रा. कानेटकर यांनी प्रेमाचे हेच विविध रंग, प्रेमाचे हळुवार नाजूक धागे अलगदपणे आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत. - प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर.

टॅग्स :SolapurसोलापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे