शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यातील अद्यापही दीड हजार शेतीपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या ...

यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर येऊन गेला यामुळे त्या त्या परिसरातील काही ट्रान्स्फॉर्मर, खांब वाहून गेले. हजारो खांबे तुटून पडली आहेत. ते सर्व पूर्ववत करण्यासाठी शासनाने तत्काळ निधीही मंजूर केला. त्यानंतर तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आतापर्यंत २ हजार ५०० खांबाचे काम पूर्ण झालेले आहेत. उर्वरित १०० खांबाचे काम सुरू आहे.

अद्याप मैंदर्गी, दुधनी, तडवळ, करजगी या भागातील कामे प्रलंबित आहेत. यामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांचे शेतीपंप पाणी असूनही बंद आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी, जनावरांचे हाल सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी आज,उद्या वीज सुरू होईल, अशी अपेक्षा ठेवून रब्बीतील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. तर काही शेतकरी वीज जोडणी झाल्यानंतर पेरणी करू हा उद्देश ठेवून वाट पाहत आहेत. परिणामी शेकडो हेक्टर क्षेत्र पेरणीविना तसेच आहे.

वीज जोडणी विलंब होण्याची कारणे

अजूनही काही भागात चिखल असल्यामुळे पोल घेऊन जाणारी वाहने जात नाहीत. सर्वत्र झाडेझुडपी वाढल्यामुळे घटनास्थळी जाऊन काम करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. तो कारखान्याला गेल्याशिवाय काम करणे अशक्य आहे. अशा विविध अडचणीमुळे आजही १५०० शेतकऱ्यांच्या शेतात वीज चालू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

कोट :::::::::::

मागील एक महिन्यापेक्षा जास्त दिवसात शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. महापुरात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक विजेचे खांब नव्याने उभारले आहेत. ज्या ठिकाणी जाणेच अशक्य आहे. तेथील काम रखडले आहे. लवकरच १०० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.

- राजकुमार म्हेत्रे,

उपकार्यकारी अभियंता