शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्यासाठी पुण्याच्या बैठकीस जाणाऱ्या कार्यकर्त्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरी मिळवल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. उजनी धरण पाणी बचाव ...

उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंजुरी मिळवल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून जनहितचे प्रभाकर देशमुख, अतुल खुपसे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांनी उजनी जलाशयात ‘जलसमाधी आंदोलन छेडले होते. यावर प्रशासनाने पालकमंत्र्यांसमवेत पुण्यात सिंचन भवन येथे १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीचे पत्र बचाव समितीला दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना भीमानगर चेकपोस्टवर पोलिसांना अडवले.

बैठकीला जाऊ नये यासाठी मज्जाव करण्यात आला. वेळेवर पोचण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला.

परंतु प्रभाकर भैय्या देशमुख व उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती सचिव माऊली हळवणकर हे पुणे सोलापूर हायवेने जात असताना त्यांना अडवून त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना अडवून जाऊ दिले नाही. फक्त तिंघाना सोडण्यात आले.

यावर कार्यकर्त्यांना नाहक त्रास देऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा आल्याचा आरोप उजनी धरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. तर हिकडे अतुल खुपसे व त्याचे सहकारी दुसऱ्या मार्गाने म्हणजेच करमाळा भिगवण रोडने गेले असता त्यानांही डिकसळच्या पुलावर अडवले. ५० पोलिसांचा फौज फाटा येथे तैनात होता. तब्बल तासभर त्यांना मज्जाव करण्यात आला. तर पंढरपूर व मंगळवेढ्यातील संघटनेचे कार्यकर्ते नरसिंहपूर, बावडा,बारामती या मार्गाने गेले. काही कार्यकर्ते आदल्या दिवशीच पुणे येथे जाऊन थांबले होते. सर्वजण पुणे येथे उशिरा का होईना पण बैठकीला दाखल झाले.

----

शासनानेच बोलावले तरी विरोध कराय काय?

शासनानेच बैठक आयोजित केली. बैठकीचे निमंत्रण दिले आहे, मग शासनाचेच अधिकारी बैठकीला जाण्यासाठी विरोध करतात. मी काय दरोडेखोर वाटतोय का तुम्हाला? मी एक समाजसेवक आहे. अशा शब्दात उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल यांच्याकडे आपला संताप व्यक्त केला.

-----

इंदापूर तालुक्यातील शेतकरी अगोदरच सिचंन भवनला हजर होते. त्यांना बैठकीला बोलावण्याचे काय कारण होते. त्यांना का अडवत नाही? आम्हालाच का फक्त पदाधिकाऱ्यांना बोलावण्याची अटक घातली गेली.

- अतुल खुपसे, अध्यक्ष, उजनी धरण संघर्ष समिती

---

आमची भाकरी पळवू नका म्हटले आपण पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना म्हटले तर इंदापूर तालुक्यातील शेतकरी बैठकीतच माझ्या अंगावरवरच धावून आले.

- विठ्ठल मस्के, सदस्य, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती