शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सोलापूर जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये नाही नळपाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 1:20 PM

जलजीवन मिशनचा अंमल; नव्याने अधिकाºयांची नियुक्ती

सोलापूर : जिल्ह्यात अद्याप ४७ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना नाही. सन २०२४ पर्यंत सर्व गावे नळपाणीपुरवठा योजनेने जोडण्याचे उद्दिष्ट असून, ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रिक्त पदांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यात १0२९ गावे आहेत. यातील १0८७ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना आहे, उर्वरित ४७ गावांमध्ये अद्याप पाणीपुरवठा योजना राबविलेली नाही. केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत २0२४ पर्यंत सर्व खेड्यांमधील प्रत्येक घरात नळाचे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेनुसार या उर्वरित गावात नळपाणीपुरवठा योजना राबवायची आहे. या योजनेत उर्वरित गावांचा आराखडा सादर करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी दिली.

जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन योजना राबविली जाणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या विभागातील रिक्त पदांवर गुरुवारी जीवन प्राधिकरणकडील कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरसाठी पी. सी. भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषदेकडील लघु पाटबंधारे विभागाचे पद रिक्तच आहे.

स्वच्छ भारत मिशनचे काय...ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी यापूर्वी जलस्वराज्य योजना राबविली गेली होती. जिल्हा परिषदेत याचे दोन भाग आहेत. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे नव्याने अधिकारी नियुक्त झाले आहेत. या विभागात कंत्राटी कर्मचारी आहेत. पण जलजीवनचे कर्मचारी नियुक्त झाल्यावरच काम सुरू होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकGovernmentसरकार