शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मुलांचे अपहरण करणारी टोळी जिल्ह्यात कुठेही नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : अभय डोंगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:14 IST

मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरवले जात आहे़

ठळक मुद्देनिष्पाप व्यक्तींना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये - पोलीसभीती पसरवणाºया अफवांवर विश्र्वास ठेवू नये : पोलीस

सोलापूर :  अलीकडे सोशल मीडियावरून जागोजागी मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरवले जात आहे़ पण सोलापूर जिल्ह्याती कोणत्याही भागात अथवा गावात मुलांच्या अपहरणाची घटना घडली नसून नागरिकांनी अशा भीती पसरवणाºया अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी आॅनलाइन लोकमतशी बोलताना केले आहे़ 

पुढे बोलताना अभय डोंगरे म्हणाले की, सध्या शाळांना सुट्या लागल्या आहेत़ लहान लहान मुले दिवसभर विविध खेळ खेळत आहेत़ अशातच कुठल्यातरी घटनांचे फोटो व व्हिडिओ अपलोड करून त्याद्वारे मुलांचे अपहरण केले जात आहे तेव्हा नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन करणारे मॅसेज व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत़ एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कारणासाठी परगावहून आलेल्या अपरिचित निष्पाप व्यक्तींना पकडून गावातील नागरिक मारहाण करण्याचे प्रकारही घडत आहेत़ तेव्हा नागरिकांनी कोणत्याही निष्पाप व्यक्तींना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये, अशा प्रकरणी कोणी सापडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक एस़ विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सर्वत्र याविषयी जनजागृती करण्यात येत असल्याचेही पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे यांनी यावेळी सांगितले़ जिल्ह्यात कोणत्याही गावात अनोळखी व संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा १०० नंबरवर फोन करून तशी माहिती कळवावी़ कोणत्याही निष्पाप व्यक्तींना नागरिकांनी मारहाण करू नये़ शिवाय मोबाईलवर अफवा पसरविणाºया व्यक्तींविरूध्द पोलीस कडक कारवाई करणार आहे़ त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी सोशल मिडियावर त्याप्रकारचे व्हिडिओ व फोटो व्हायरल करू नये असेही डोंगरे यांनी नमुद केले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसSocial Mediaसोशल मीडिया