शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

मुलांचे अपहरण करणारी टोळी जिल्ह्यात कुठेही नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : अभय डोंगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:14 IST

मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरवले जात आहे़

ठळक मुद्देनिष्पाप व्यक्तींना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये - पोलीसभीती पसरवणाºया अफवांवर विश्र्वास ठेवू नये : पोलीस

सोलापूर :  अलीकडे सोशल मीडियावरून जागोजागी मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरवले जात आहे़ पण सोलापूर जिल्ह्याती कोणत्याही भागात अथवा गावात मुलांच्या अपहरणाची घटना घडली नसून नागरिकांनी अशा भीती पसरवणाºया अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी आॅनलाइन लोकमतशी बोलताना केले आहे़ 

पुढे बोलताना अभय डोंगरे म्हणाले की, सध्या शाळांना सुट्या लागल्या आहेत़ लहान लहान मुले दिवसभर विविध खेळ खेळत आहेत़ अशातच कुठल्यातरी घटनांचे फोटो व व्हिडिओ अपलोड करून त्याद्वारे मुलांचे अपहरण केले जात आहे तेव्हा नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन करणारे मॅसेज व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत़ एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कारणासाठी परगावहून आलेल्या अपरिचित निष्पाप व्यक्तींना पकडून गावातील नागरिक मारहाण करण्याचे प्रकारही घडत आहेत़ तेव्हा नागरिकांनी कोणत्याही निष्पाप व्यक्तींना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये, अशा प्रकरणी कोणी सापडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक एस़ विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सर्वत्र याविषयी जनजागृती करण्यात येत असल्याचेही पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे यांनी यावेळी सांगितले़ जिल्ह्यात कोणत्याही गावात अनोळखी व संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा १०० नंबरवर फोन करून तशी माहिती कळवावी़ कोणत्याही निष्पाप व्यक्तींना नागरिकांनी मारहाण करू नये़ शिवाय मोबाईलवर अफवा पसरविणाºया व्यक्तींविरूध्द पोलीस कडक कारवाई करणार आहे़ त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी सोशल मिडियावर त्याप्रकारचे व्हिडिओ व फोटो व्हायरल करू नये असेही डोंगरे यांनी नमुद केले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसSocial Mediaसोशल मीडिया