शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
3
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
4
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
5
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
6
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
7
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
8
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
9
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
10
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
11
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
12
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
13
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
14
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
15
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
16
‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?
17
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासाठी तरी थोडासा ब्रेक हवाच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:09 IST

कोरोना यमराज सैतानासारखा एक एक माणूस गिळून आपल्या कवेत घेतोय...

जेव्हा चीनमध्ये या अज्ञात शत्रूंनी आपला खेळ सुरू करून उद्रेक केला  तेव्हा युरोपातील काही देश गाफील राहिलेले दिसले. हा भारतात आला तर काय होईल ? असा अनेकांच्या मनात प्रश्न होता. कारण लोकसंख्या, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत आमचा जुना इतिहास काही चांगला नाही. भारतात अजूनही नागरिक बेफिकीरपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. आठ कोटी लोकसंख्या असलेल्या जर्मनीत १४००० बाधित सापडतात तर आपली तर लोकसंख्या १३० कोटी आहे. कोरोना यमराज सैतानासारखा एक एक माणूस गिळून आपल्या कवेत घेतोय; मात्र माणूस संपूर्ण सरकारी यंत्रणा विनवण्या करते तरी जुमानत नाही. प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नाही. मला काही होत नाही अशा फाजील आत्मविश्वासावर राहतोय.

कुठंतरी वाचलं होतं. माणसापुढं ज्यावेळी जीवणमरणाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी शंका कुशंका,  शक्यता - अशक्यता सगळं बाजूला गळून पडतं आणि माणसाच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. असं कुठेतरी वाचलं होतं पण हे साफ खोटं आहे हो. असं जर असतं ना. आज कोरोनाचा व्हायरस आपला जीव घेण्यासाठी कुणाच्या हातावर, साहित्यावर, चहाच्या टेबलावर, दुकानातल्या नव्या साडीवर, एखाद्या बाटलीवर, कोणत्या गाडीच्या सीटवर कुठं कुठं टपून बसलाय हे माहीत नाहीय. तरीही आपण अमरत्वाचं वरदान मिळाल्यासारखं बेफाम होऊन गर्दीत हिंडतोय. शासनानं जमावबंदी केली तरी आपण फिरतोय. एसटीने प्रवासी संख्येत कपात केलीय म्हणून आपण खासगी गाड्या, रिक्षा,  काळी पिवळीला लटकून प्रवास करतोय. आठवडे बाजार बंद करायचे आदेश असताना, तिथं जाऊन भाजी खरेदी करणारे कुटुंबवत्सल माणसं पाहिले की यांच्या अमरत्वाबद्दल खात्रीच पटती हो.

नेमकी धडपड चाललीय कशासाठी तेच कळत नाहीय. ज्या कुटुंबासाठी आपण वेगवेगळ्या गाड्यात, काळी पिवळीत गर्दी करून प्रवास करतोय, ज्या चिमुकल्यांसाठी, कुटुंबासाठी आपण भाजीपाला आणि खाऊ खरेदी करतोय त्यांच्यासाठी आपण फुकटात कोरोनाचे विषाणू तर घरी नेत नाहीत ना? याचाही विचार करायचं भान आपल्या जनतेला का नाही? हा संसर्ग विषाणू आहे हे का माणसाला समजत नाही? हा संसर्ग होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा, डॉक्टर, आरोग्याधिकारी,  सेवक,  स्वास्थ्य केंद्र यांच्यावर किती ताण येत असेल याचा विचारही माणूस का करत नाही. या संकटाच्या काळात आत्तापर्यंत ज्याप्रकारे ही सर्व उभे झालेत ते कौतुकास्पद आहे. आपल्या कुटुंबासाठी यांना आपण थोडी साथ देऊन हे संकट टाळू शकतो.

जे पॉझिटिव्ह रुग्ण  आहेत त्यातील अजूनतरी एकही झोपडपट्टीतील किंवा गल्लीतील पेशंट नाही. एकतर ते परदेशातून आलेले आहेत किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. सव्वाशे कोटी भारतीय ही आपली याक्षणी सर्वात मोठी कमकुवत बाजू बनली आहे, कारण हा विषाणू जर भारतातील एकाही ग्रामीण भागात, झोपडपट्टीत किंवा गल्ली, मोहल्ल््यात घुसला तर प्रत्येक माणूस एका ‘बॉम्ब’ सारखा असेल, ‘मानवी बॉम्ब’ आपल्यामुळे आपल्यातील कोणीतरी मरेल लक्षात ठेवा! होणाºया नुकसानीची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. अजूनही लोक बिनधास्त अज्ञानात जगत आहेत. भरपूर गर्दी करत आहेत. लोक अजूनही शासनाच्या सूचना टाळून आपले काम करत आहेत. तुम्हीही मराल आणि सोबत कमीत कमी दहा लोकांना घेऊन मराल. शासनानं कोरोनाचा प्रसार थांबवण्याचे कितीही प्रयत्न करोत. पण मला जोवर त्याची झळ पोहचत नाही तोवर मला अक्कल येणारच नाही का? माझी रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पण घरी ‘बाबा’ येतील अशी वाट पाहणाºया चिमुकल्याची, साठी ओलांडलेल्या आई-वडिलांची तेवढी प्रतिकारशक्ती आहे का? किमान  स्वत:साठी नाही पण आपल्या कुटुंबासाठी तरी घरी बसा.  मला काही होत नाही अशा फाजील आत्मविश्वासात राहू नका. अख्खं जग थांबलंय हो....आपणही आपल्यासाठी व  कुटुंबासाठी थोडं थांबूया का ?- प्रा. तात्यासाहेब काटकर (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरFamilyपरिवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस