शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाणी टंचाईमुळे कॅनॉलवर गेलेल्या आईला डोळ्यासमोर गमवावी लागली मुलगी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:56 IST

कोंडी तांड्यावर शोककळा; नळाला नियमित पाणी आले असते तर ही वेळ आली नसती

ठळक मुद्देरमेश राठोड व छाया रमेश राठोड हे पती-पत्नी कोंडी तांड्यावर राहण्यास आहेतदोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतातएक मुलगा, दोन मुली आहेत. मोठा मुलगा राहुल, दुसरी मुलगी खुशी आणि तिसरी मुलगी शुभांगी असा परिवार

संताजी शिंदे 

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी तांडा, गणेशनगर येथे नळाला नियमित पाणी येत नाही. पाणी टंचाईमुळे कॅनॉलला  धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईला आपली नऊ वर्षांची चिमुकली गमवावी लागली. या प्रकारामुळे  कोंडी तांड्यावर शोककळा पसरली आहे. 

रमेश राठोड व छाया रमेश राठोड हे पती-पत्नी कोंडी तांड्यावर राहण्यास आहेत. दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  त्यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. मोठा मुलगा राहुल, दुसरी मुलगी खुशी आणि तिसरी मुलगी शुभांगी असा परिवार आहे. रमेश राठोड हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. आई छाया ही कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला जाण्याची तयारी करीत होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ३ रीमध्ये शिकणारी शुभांगी दुपारी १२ वाजता शाळेतून घरी आली. दप्तर घरात ठेवून ती आईला मदत  करू लागली. शेवटी राहिलेले धुणे धुण्यासाठी आई छाया ही जवळच असलेल्या कॅनॉलकडे निघाली. आईसोबत शुभांगी व तिची मोठी बहीण खुशी या दोघीही मदत करण्यासाठी निघाल्या. कॅनॉलवर दुपारी १ वाजता आल्या़ आई कडेला बसून धुणे धुवत होती. दोन्ही मुली कपड्याला साबण लावून देत होत्या. 

बराच वेळ एका ठिकाणी बसलेली शुभांगी जागा बदलण्यासाठी १.३0 वाजता उठली. बाजूला जात असताना तिचा पाय साबणावर पडला. ती घसरून थेट कॅनॉलमध्ये पडली. पाणी खोल होते़ आईला पोहता येत नव्हतं़ मुलगी पडल्याचे पाहताच तिने मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना ओरडण्यास सुरूवात केली. आई छाया यांचा आवाज ऐकून शेतात काम करणारे राजू राठोड हे धावत आले. मुलगी पाण्यात पडल्याचे समजताच त्यांनी उडी मारली. शुभांगी सापडत नव्हती़ त्यांनी आणखी काही लोकांना आवाज दिला. १0 ते १२ तरूण धावत कॅनॉलच्या दिशेने आले. पाण्यात उतरून शुभांगीचा शोध घेतला. पाण्याला वेग होता, अर्धा किलोमीटरपर्यंत तिचा शोध घेतला. शुभांगी पाण्यातील चटईसारख्या कापडात अडकून वाहत जात असताना एका तरूणाच्या हाती लागली. तिला बाहेर काढून तत्काळ सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र शुभांगीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

शुभांगीचे आई-वडील सकाळी झाले गायब...- शुभांगी हिच्यावर शनिवारी रात्री तांड्याजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घरी आल्यानंतर दोघा पती-पत्नीला रात्रभर झोप आली नाही. हसत खेळत अंगणात आणि अंगाखांद्यावर बागडणारी मुलगी अचानक गेल्याने दोघांवर आभाळ कोसळलं़ नातेवाईक सकाळी उठले़ रमेश व छाया हे दोघे घरात नव्हते. अचानक दोघे गायब झाल्याने नातेवाईक घाबरले. दोघांचा शोध घेऊ लागले़ बराच वेळ दोघे कुठेही सापडत नव्हते. सकाळी सात वाजता एका व्यक्तीने निरोप दिला की दोघे स्मशानभूमीत आहेत. नातेवाईक स्मशानभूमीत गेले तेव्हा दोघे पती-पत्नी शुभांगीचा अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी बसून मोठमोठ्याने रडत होते. 

तांड्याला पाण्याची मोठी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकंती करावी लागते. ग्रामपंचायतीच्या नळाला पाणी येत नाही. नळाला नियमित पाणी आले असते तर धुण्यासाठी कॅनॉलवर जाण्याची आवश्यकता लागली नसती. शुभांगीसारखी चिमुकली हातून गेली नसती. संरक्षणाच्या दृष्टीने कॅनॉलला जाळी बसवण्यात यावी.

 - राजू राठोड, नातेवाईक

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातWaterपाणीPoliceपोलिसdroughtदुष्काळ