शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने हमीभाव योजनेतही केली फसवणूक - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:18 IST

ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी त्वरित देण्याची मागणी

ठळक मुद्देराज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलनकेंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढशेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर

सोलापूर : मोदी सरकारनं मोठा गवगवा करून शेतकºयांसाठी जाहीर केलेला खरीप पिकांचा हमीभाव फसवा आहे. शेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर पोहोचलेला असताना केंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढ केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या योजनेतही पुन्हा शेतकºयांची फसवणूक होणार आहे, अशी माहिती खा़ राजू शेट्टी यांनी सोलापूरात बोलताना दिली़ 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी सरकार शेतकºयांच्या बाबतीत नेहमीच दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप करीत दिवसेंदिवस दुधाचे दर कमी होत चाललेले असताना ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यामुळे दूध उत्पादकांना आपली जनावरे वाºयावर सोडून देण्याची वेळ आली आहे. शेजारच्या कर्नाटकात प्रतिलिटर ४ रुपये दिले जात आहेत. आंध्र, तेलंगणाचीही सकारात्मक भूमिका आहे. महाराष्टÑातील सरकार मात्र काहीच करायला तयार नाही याबद्दल संताप व्यक्त केला.

राज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलन होते. प्रत्यक्षात महिन्याला दीडशे कोटी लिटरची गरज आहे. शासनाने या पशुपालकांना मदत दिली तर सुरळीत होणार आहे, मात्र सरकारची शेतकºयांच्या बाबतीत मदत करण्याची मानसिकता नाही. दूध संघाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान दिले गेले, मात्र त्यांनी ते अन्यत्र वळवले आहे.

दूध उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावेत ही आमची आग्रही मागणी आहे. याशिवाय ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी २ हजार कोटी रुपये आहे तीही देण्यात यावी, अन्यथा १६ जुलैपासून राज्यभरातून दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खा.शेट्टी यांनी दिला.

सरकारच्या लाडक्या मुंबईसाठी एक थेंबही दुधाचा पुरवठा होणार नाही दूध उत्पादक शेतकरी भले हे दूध वारीतल्या वारकºयांना, गोरगरिबांना देऊन त्यांचा दुवा घेईल पण स्वस्थ बसणार नाही, असेही शेट्टी यांनी सूचित केले. 

१६ जुलैपासून दूध बंद आंदोलनदुधाला हमीभाव मिळवून देणे हे सरकारचे काम आहे. मात्र त्यांना काहीच करायचे नाही. अन्य राज्यांतील सरकार दूध उत्पादकांच्या बाबतीत सकारात्मक असताना महाराष्टÑ शासन मात्र उदासीन धोरण अवलंबत आहे. सरकारला शांततेची भाषा कळत नाही म्हणून येत्या १६ जुलै २०१८ पासून दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली २ हजार कोटी रुपये थकबाकी तातडीने          द्यावी या मागणीसाठी दूध पुरवठा  बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी          सोलापुरात पत्रकार परिषदेद्वारे दिला. 

दोन्ही बाजूने शेतकºयांचीच गोची- केंद्र सरकारने हमीभाव वाढवले असले तरी वाढीव भाव नेमका कुणी द्यायचा हाही मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले असले तरी सरकार हमीभावाने शेतकºयांचा माल खरेदी करत नाही आणि बाजारपेठेतील व्यापारीही हमीभाव देत नाही. अशा स्थितीत शेतकºयांचीच गोची होते. शेतीमालाचे उत्पादन घेताना खर्चातही २० ते २५ टक्के वाढ झालेली आहे. आणि दरवाढही तेवढ्याच प्रमाणात झाली आहे. म्हणजे शेतकºयांच्या हाती काहीच नाही. मग त्यांनी करायचे काय? असा सवालही खा. शेट्टी यांनी सरकारला केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBJPभाजपा