शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

मोदी सरकारने हमीभाव योजनेतही केली फसवणूक - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:18 IST

ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी त्वरित देण्याची मागणी

ठळक मुद्देराज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलनकेंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढशेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर

सोलापूर : मोदी सरकारनं मोठा गवगवा करून शेतकºयांसाठी जाहीर केलेला खरीप पिकांचा हमीभाव फसवा आहे. शेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर पोहोचलेला असताना केंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढ केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या योजनेतही पुन्हा शेतकºयांची फसवणूक होणार आहे, अशी माहिती खा़ राजू शेट्टी यांनी सोलापूरात बोलताना दिली़ 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी सरकार शेतकºयांच्या बाबतीत नेहमीच दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप करीत दिवसेंदिवस दुधाचे दर कमी होत चाललेले असताना ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यामुळे दूध उत्पादकांना आपली जनावरे वाºयावर सोडून देण्याची वेळ आली आहे. शेजारच्या कर्नाटकात प्रतिलिटर ४ रुपये दिले जात आहेत. आंध्र, तेलंगणाचीही सकारात्मक भूमिका आहे. महाराष्टÑातील सरकार मात्र काहीच करायला तयार नाही याबद्दल संताप व्यक्त केला.

राज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलन होते. प्रत्यक्षात महिन्याला दीडशे कोटी लिटरची गरज आहे. शासनाने या पशुपालकांना मदत दिली तर सुरळीत होणार आहे, मात्र सरकारची शेतकºयांच्या बाबतीत मदत करण्याची मानसिकता नाही. दूध संघाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान दिले गेले, मात्र त्यांनी ते अन्यत्र वळवले आहे.

दूध उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावेत ही आमची आग्रही मागणी आहे. याशिवाय ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी २ हजार कोटी रुपये आहे तीही देण्यात यावी, अन्यथा १६ जुलैपासून राज्यभरातून दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खा.शेट्टी यांनी दिला.

सरकारच्या लाडक्या मुंबईसाठी एक थेंबही दुधाचा पुरवठा होणार नाही दूध उत्पादक शेतकरी भले हे दूध वारीतल्या वारकºयांना, गोरगरिबांना देऊन त्यांचा दुवा घेईल पण स्वस्थ बसणार नाही, असेही शेट्टी यांनी सूचित केले. 

१६ जुलैपासून दूध बंद आंदोलनदुधाला हमीभाव मिळवून देणे हे सरकारचे काम आहे. मात्र त्यांना काहीच करायचे नाही. अन्य राज्यांतील सरकार दूध उत्पादकांच्या बाबतीत सकारात्मक असताना महाराष्टÑ शासन मात्र उदासीन धोरण अवलंबत आहे. सरकारला शांततेची भाषा कळत नाही म्हणून येत्या १६ जुलै २०१८ पासून दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली २ हजार कोटी रुपये थकबाकी तातडीने          द्यावी या मागणीसाठी दूध पुरवठा  बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी          सोलापुरात पत्रकार परिषदेद्वारे दिला. 

दोन्ही बाजूने शेतकºयांचीच गोची- केंद्र सरकारने हमीभाव वाढवले असले तरी वाढीव भाव नेमका कुणी द्यायचा हाही मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले असले तरी सरकार हमीभावाने शेतकºयांचा माल खरेदी करत नाही आणि बाजारपेठेतील व्यापारीही हमीभाव देत नाही. अशा स्थितीत शेतकºयांचीच गोची होते. शेतीमालाचे उत्पादन घेताना खर्चातही २० ते २५ टक्के वाढ झालेली आहे. आणि दरवाढही तेवढ्याच प्रमाणात झाली आहे. म्हणजे शेतकºयांच्या हाती काहीच नाही. मग त्यांनी करायचे काय? असा सवालही खा. शेट्टी यांनी सरकारला केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBJPभाजपा