शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मनसेची माणुसकी; 'त्या' उत्तर भारतीय तरुणाच्या मृतदेहावर स्वत: केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 13:42 IST

मनसे म्हटले की खळखट्याक अन् उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांचा विरोध. उत्तर प्रदेश, बिहारी नागरिकांना त्रास देणे हेच मनसैनिकांचे काम, असं समीकरणच बनलंय. पण सोलापुरातील एक घटनेमुळे मनसेची ही ओळख पूर्णतः बदलली गेलीय.

बार्शी (सोलापूर)  - मनसे म्हटले की खळखट्याक अन् उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांचा विरोध. उत्तर प्रदेश, बिहारी नागरिकांना त्रास देणे हेच मनसैनिकांचे काम, असं समीकरणच बनलंय. पण सोलापुरातील एक घटनेमुळे मनसेची ही ओळख पूर्णतः बदलली गेलीय. मनगिरे मळा येथे शुक्रवारी (5 ऑक्टोबर) पहाटे पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत राजेश साहू नावाचा उत्तर प्रदेशातील तरुण मृत्युमुखी पडला, तर त्याच्या पत्नीची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे. पत्नी रुग्णालयात, घरात पित्याचे छत्र हरवलेला चिमुकला आणि उर्वरित कुटुंब उत्तर प्रदेशात. यामुळे राजेश यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी मनसैनिकांनी पुढाकार घेत राजेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मनसेच्या या कृतीमुळे नेहमी उत्तर प्रदेश - बिहारींच्या रागाचा विषय असणारी मनसे आज त्यांच्या हृदयात घर करुन बसली आहे. 

बार्शी तालुका मनसे अध्यक्ष विक्रमसिंह पवार यांनी आपल्या कार्यातून मनसेची प्रतिमाच बदलली. तसेच मनसे ही उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांच्या विरोधात नसून केवळ मराठीला विरोध करणाऱ्याविरूद्ध लढते, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या राजेश साहू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला. मनसेचे विक्रमसिह पवार यांनी राजेश यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली.तसेच राजेश यांच्या चिमुकल्या मुलास कवेत घेऊन त्यास  धीर दिला. 'आपण परप्रांतीयांच्या विरोधात नसून जे मराठीविरुद्ध वागतात त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. जे लोक महाराष्ट्रासाठी काम करतात, अशा प्रत्येक नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत राहील'', असेही पवार यांनी यावेळी म्हटले.  

टॅग्स :MNSमनसेSolapurसोलापूरUttar Pradeshउत्तर प्रदेश