शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एक कोटीवर मेट्रिक टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:52 IST

सोलापूर : सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथम असून ३१ साखर कारखान्यांचे बुधवारपर्यंत एक कोटी ६६ हजार ५७९ ...

ठळक मुद्दे सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथमअहमदनगर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे

सोलापूर : सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथम असून ३१ साखर कारखान्यांचे बुधवारपर्यंत एक कोटी ६६ हजार ५७९ मे.टन गाळप झाले आहे.  ६७ लाख ५८ हजार ३०५ मे.टन गाळप करून अहमदनगर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर तर ६५ लाख ४४ हजार ५७३ मे. टन गाळप करणारा कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप एक नोव्हेंबरपासून सुरू झाले. ऊसदराच्या प्रश्नांमुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने थोड्या उशिराने सुरू झाले; मात्र सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मागील सव्वादोन महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जिल्ह्यात यावर्षी प्रथमच ३१ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मागील वर्षी ३० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी गोकुळ माऊली हा साखर कारखाना नव्याने गाळप हंगाम घेत आहे.  बुधवार दिनांक ९ जानेवारीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी एक कोटी ६६ हजार ५७९ मे.टन गाळप तर ९९ लाख २९ हजार १५ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा सरासरी ९.८६ टक्के इतका मिळाला आहे. राज्यात सोलापूर जिल्हा ऊस गाळपात अव्वल ठरला आहे.शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांचे ६७ लाख ५८ हजार ३०५ मे.टन गाळप तर ७१ लाख ९ हजार ४३५ क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्याचे ऊस गाळप दुसºया क्रमांकाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने वगळता अन्य साखर कारखाने १२ नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी ६५ लाख ४४ हजार ५७३ मे.टन गाळप झाले आहे. ७७ लाख ३८ हजार ६२० क्विंटल साखर तयार झाली असून ११.८२ टक्के उतारा पडला आहे. गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसरा आहे. 

 शिंदेने १० लाखांचा टप्पा ओलांडलाच्माढा तालुक्यातील पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना १० लाख १२ हजार २४० मे.टन गाळप करून राज्यात प्रथमस्थानी आहे. कोल्हापूरचा जवाहर कारखाना ६ लाख ७२ हजार ३५० मे.टन. गाळप करून दुसºया,  इंदापूर सहकारी ६ लाख ३८ हजार ९१० मे.टन गाळप करून तिसºया तर बारामती अ‍ॅग्रो ६ लाख २९  हजार ९३५ मे.टन गाळप करून चौथ्या क्रमांकावर आहे. आमचा कारखान्याचे यावर्षी २० लाख मे. टन गाळप होईल. कारखाना १५ मार्चपर्यंत सुरू राहील असा अंदाज आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.-आर.एस.रनवरे, कार्यकारी संचालक,विठ्ठलराव शिंदे कारखाना

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणेAhmednagarअहमदनगरkolhapurकोल्हापूर