शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

‘‘माणसं चांगली असतात अन् ती भेटतातही.’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:44 IST

मार्च संपत आला तसे प्रत्येकाला सुट्यांचे वेध लागले. या सुटीत बाहेरगावी जावं, छान ट्रीप करून यावी हा प्लॅन पक्का ...

मार्च संपत आला तसे प्रत्येकाला सुट्यांचे वेध लागले. या सुटीत बाहेरगावी जावं, छान ट्रीप करून यावी हा प्लॅन पक्का होता. मग नेहमीप्रमाणं बºयाच नातेवाईकांनाही ट्रीपसाठी विचारण्यात आलं. त्यांनीही नेहमीप्रमाणे सुरुवातीला उत्साह दाखवला आणि नंतर तो ओसरतही गेला. सगळे गळून गेल्यावर शेवटी राहिलो आम्ही तिघी-चौघीच ! आई, मावशी, ताई आणि मी! पण मग ‘‘चौघीच कसं जाणार ना कुठं? कोणीतरी पुरुष सोबत हवाच ना!’’ हा टिपिकल सूर सगळ्यांनीच आळवला. पण खरंच चौघींचं जाणं इतकं कठीण आहे का, असा प्रश्न मी आधी माझ्या मनाला विचारला आणि जेव्हा मनानं हसत उत्तर दिलं ‘अजिबात नाही’ तेव्हा मग हाच प्रश्न मी या तिघींना विचारला. खरं तर उत्तराची अपेक्षा नव्हतीच त्यांच्याकडून! मीच माझं म्हणणं समोर ठेवलं अन् त्यांना तयार केलं. ठिकाण ठरलं. ‘अमृतसर, चंदीगढ आणि सिमला!’ तेही विमानानं जाणं आणि विमानानंच येणं! उत्सुकता आणि उत्साह चांगलाच वाढला, पण तरीही निघेपर्यंत प्रत्येकाच्या मनात धडधड! विमानाची तिकिटं बुक झाली, हॉटेल्सचंही बुकिंग झालं. सगळं ठरलं. निघायचा दिवस उजाडला. निघायच्या काही तास आधी मामा आला. त्यालाही आमची काळजी होतीच! ‘‘कसं तुम्ही चौघीच जाणार की काय की! जपून राहा! माणसं चांगली नसतात’’, असा काळजीपूर्वक सल्ला दिला त्याने. त्याला फक्त इतकंच म्हटलं की, ‘‘माणसं चांगली असतात आणि चांगली माणसं भेटतातही.’’ 

फायनली प्रवासाला सुरुवात झाली. इथून मुंबई, मुंबई ते एअरपोर्ट इथपर्यंत ठीक होतं. पण पहिल्यांदाच विमानानं प्रवास करणाºया आम्ही चौघी, त्यामुळे विमानात बसेपर्यंत टेन्शन. पण तिथे चेहºयावर निरंतर स्मितहास्य सांभाळणाºया सुंदरींना (एअर होस्टेस) आमचं नवखेपण सवयीनं जाणलं आणि योग्य ते मार्गदर्शन केलं. तिकडच्या सगळ्या गोष्टीतून पार होत होत ‘गुड इव्हिनिंग’ म्हणणाºया हवाई सुंदरीनं आमचं स्वागत केलं आणि आम्हीही चला एकदाचे विमानात आलोच्या तिच्या दुप्पट स्माईल देऊन तिला गुड इव्हिनिंग म्हटलं आणि आत प्रवेश केला. सुदैवानं एक खिडकीची जागा मिळाली. अडीच तासाच्या फ्लाईटमध्ये आळीपाळीने खिडकीत बसून आम्ही हवेत तरंगण्याचा सुखद अनुभव घेतला आणि सात वाजेपर्यंत अमृतसरला पोहोचलो. तिकडेही सुवर्ण मंदिराच्या परिसरात राहण्याची सोय व्यवस्थित होती. गुरुद्वारा, जालीयनवाला बाग आणि मग वाघा बॉर्डरचा विलक्षण अनुभव घेऊन ट्रेनने आम्ही गुरुद्वारातील माझ्यातला मीपणा संपवणाºया त्या सेवाभावापुढे मात्र प्रत्येक जण नतमस्तकच होतो. पुढे चंदीगढ, सिमला, तिथली सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहिली.

या प्रवासात हरप्रीतसिंग अर्थात ‘हॅरी’ नावाचे पाजी आमच्यासोबत होते. त्यांच्याच कारमधून आमचा हा सगळा प्रवास होता. आवड म्हणून पर्यटकांना असं फिरवणारे पाजी अगदी आमच्याच कुटुंबातले वाटले. आपुलकीने प्रत्येकाची काळजी घेणारे, आमची गैरसोय होऊ नये, यासाठी धडपडणारे आणि पंजाबी भाषेत अधूनमधून हिंदी पेरत मनातलं सगळं शेअर करत राहणारे पाजी आई-मावशीसाठी बेटा झाले तर ताई आणि माझ्यासाठी भैय्या! एक नवं नातं गवसलं आम्हाला. खूप मज्जा केली आम्ही. 

मग सुरू झाला परतीचा प्रवास. तेव्हा जाणवलं की, आता कुठे प्रवासातला आनंद जाणवतोय. होतं असं की, गाव सोडलं तरी सुटत नाही. थोडं-थोडं ते सुटायला लागतं. आपण प्रवासात रमायला लागतो तेव्हा पुन्हा घर गाठण्याची वेळ जवळ यायला लागते. आम्ही परतीच्या विमानात बसलो. वेगळा अनुभव घेऊन आम्ही सोलापूरला पोहोचलो. त्याचबरोबर होता एक नवा आत्मविश्वास! की आपण सगळं नीट मॅनेज करू शकतो. आल्यावर मामानं विचारलं ‘मग सगळं नीट झालं ना?’ तितक्यात हॅरी पाजींचा मेसेज आला ‘सिस्टर सब अच्छेसे पहुँच गए ना?’ मी त्यांना ‘हाँ भैय्याजी’ असा मेसेज केला आणि मामाला म्हटलं ‘‘सगळं भारी झालं... माणसं चांगली असतात आणि चांगली माणसं भेटतातही !- ममता बोल्ली(लेखिका कवयित्री अन् साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स