शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कृत्रिमरित्या अंडी उबवून जन्माला घातलेली माळढोकची पिल्ल नान्नज अभरण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2022 15:52 IST

प्रस्तावासाठी वनसंरक्षकांच्या सूचना : राजस्थानची मदत : दोन मादी अन् एक नर असेल

सोलापूर : राजस्थान येथे कृत्रिमरीत्या अंडी उबवून माळढोकच्या पिल्लांना जन्माला घालण्यात येत आहे. त्यांच्याकडून दोन मादी व एक नर सोलापुरातील नान्नज अभयारण्य येथे आणण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अतिरिक्त उपमुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेल यांनी उपवनसंरक्षक वन्यजीव विभागाला दिले आहेत.

उत्तर सोलापुरातील नान्नज अभयारण्याची पाहणी करण्यासाठी क्लेमेंट बेल हे सोलापुरात आले होते. पाहणी केल्यानंतर अभयारण्याचे अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी राजस्थानातून माळढोक आणण्याचा प्रयत्न आहे. यासाठी पुण्यातील उपवनसंरक्षक वन्यजीव विभागाला सूचना देणार असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.

 

आधी अधिवास वाचविण्याची गरज

राजस्थानातील प्रकल्पात आधी १०० पेक्षा जास्त पिल्ले असायला हवी. त्यानंतर इतरत्र ही पिल्ले देता येतील. राजस्थान सरकारकडून माळढोकची पिल्ले सोलापुरात आणणे ही मोठी प्रक्रिया आहे. यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यापूर्वी सोलापुरातील माळढोकचा अधिवास वाचविणे गरजेचे आहे. गुजरात सरकारने त्यांच्याकडील माळढोक मध्य प्रदेश सरकारला दिला नाही. तर राजस्थान सरकार आपल्याला माळढोक देईल का, असा प्रश्न मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी उपस्थित केला आहे.

 

राजस्थानात कृत्रिमरीत्या माळढोकची अंडी उबविण्यात येतात. तेथून सोलारपुरात दोन मादी, एक नर आणणार आहोत. त्यासाठी बऱ्याच परवानग्यांची गरज असून ती एक मोठी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. नर, मादी दोघे नान्नजच्या अधिवासात राहावेत व त्यांची पिल्लेही जन्मावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.

- दिलीप वाघचौरे, सहायक वनसंरक्षक वन्यजीव

 

वर्षातून एक किंवा दोनच अंडी

माळढोक पक्षी हा वर्षातून एक किंवा दोनच अंडी देतो. या अंड्यातून २३ ते २७ दिवसांनंतर पिल्ले बाहेर पडतात. माळढोकला अधिवासासाठी मोठी जागा मिळत नसल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. माळढोक हा १५ ते २० वर्षांपर्यंत जगतो. नर हा अंडी व पिल्लांची काळजी घेत नाही. त्यामुळे मादीवरच अधिक जबाबदारी पडते.

 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय