शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

माहेरवाशीण आशाबाई माढेंनी भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:46 IST

दुष्काळग्रस्त डोंबरजवळगेत मुंबईत वसलेल्या आशाबार्इंनी स्वखर्चातून मारली बोअरवेल 

ठळक मुद्देडोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते.

शंभूलिंग आकतनाळ/ विजय विजापुरे 

चपळगाव /बºहाणपूर : लग्नानंतर सासरी गेलेली स्त्री संसाराच्या जबाबदारीत अडकून पडते. परंतु माहेरी, माहेरच्या गावावर संकट आल्यानंतर निवारणासाठी धावून येणारी माहेरवाशिण क्वचितच पाहायला मिळते. डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) या गावच्या आशाबाई माढे (आता सासरी मुंबईत वसलेल्या) यांनी माहेरच्या गावावर असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चातून चक्क बोअरवेल मारून दिली. विशेष म्हणजे यास तब्बल तीन इंच पाणी लागल्याने डोंबरजवळगेच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आधार मिळाला आहे.

डोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्या दोन-तीन महिन्यांत आपल्या माहेरी डोंबरजवळगेला येत असतात. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते. जनावरांचेही हाल सुरू आहेत. 

शुक्रवारी आशाबाई माढे डोंबरजवळगेला आल्या असता त्यांनी ही परिस्थिती पाहिली. तत्काळ बोअरवेलची गाडी मागविण्यात आली अन् ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराच्या आवारात बोअर मारण्यास प्रारंभ केला. याला यश आले. १०० फुटांपासून ३६० फुटांपर्यंत जवळपास तीन इंच पाणी लागले. पाणीटंचाईत होरपळणाºया गावक ºयांच्या चेहºयावरही पाणी आले. 

एका माहेरवाशिणीने अख्ख्या गावाची तहान भागविण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कार्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दयानंद पवार, निलप्पा पाटील, हिरामणी नारायणकर, मल्लिनाथ चौधरी, अंबणप्पा दुलंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डोंबरजवळगे या माझ्या माहेरगावाला अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. मी माहेरी येते त्यावेळी पाणीटंचाईचे रूप उग्र होताना पाहिले. आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून शुक्रवारी बोअर मारले. ग्रामदैवत महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मुबलक पाणीही लागले. ग्रामस्थांचा वनवास मिटावा हीच भावना आहे.     - आशाबाई माढे

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईWaterपाणी