शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

माहेरवाशीण आशाबाई माढेंनी भागविली गावाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:46 IST

दुष्काळग्रस्त डोंबरजवळगेत मुंबईत वसलेल्या आशाबार्इंनी स्वखर्चातून मारली बोअरवेल 

ठळक मुद्देडोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते.

शंभूलिंग आकतनाळ/ विजय विजापुरे 

चपळगाव /बºहाणपूर : लग्नानंतर सासरी गेलेली स्त्री संसाराच्या जबाबदारीत अडकून पडते. परंतु माहेरी, माहेरच्या गावावर संकट आल्यानंतर निवारणासाठी धावून येणारी माहेरवाशिण क्वचितच पाहायला मिळते. डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) या गावच्या आशाबाई माढे (आता सासरी मुंबईत वसलेल्या) यांनी माहेरच्या गावावर असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चातून चक्क बोअरवेल मारून दिली. विशेष म्हणजे यास तब्बल तीन इंच पाणी लागल्याने डोंबरजवळगेच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आधार मिळाला आहे.

डोंबरजवळगे येथील राम क्षीरसागर यांच्या भगिनी आशाबाई माढे या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्या दोन-तीन महिन्यांत आपल्या माहेरी डोंबरजवळगेला येत असतात. गेल्या चार महिन्यांपासून गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. गावाबाहेरून दोन-तीन किलोमीटरपर्यंत लांबवर जाऊन पाणी आणावे लागते. जनावरांचेही हाल सुरू आहेत. 

शुक्रवारी आशाबाई माढे डोंबरजवळगेला आल्या असता त्यांनी ही परिस्थिती पाहिली. तत्काळ बोअरवेलची गाडी मागविण्यात आली अन् ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिराच्या आवारात बोअर मारण्यास प्रारंभ केला. याला यश आले. १०० फुटांपासून ३६० फुटांपर्यंत जवळपास तीन इंच पाणी लागले. पाणीटंचाईत होरपळणाºया गावक ºयांच्या चेहºयावरही पाणी आले. 

एका माहेरवाशिणीने अख्ख्या गावाची तहान भागविण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कार्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दयानंद पवार, निलप्पा पाटील, हिरामणी नारायणकर, मल्लिनाथ चौधरी, अंबणप्पा दुलंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डोंबरजवळगे या माझ्या माहेरगावाला अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. मी माहेरी येते त्यावेळी पाणीटंचाईचे रूप उग्र होताना पाहिले. आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून शुक्रवारी बोअर मारले. ग्रामदैवत महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मुबलक पाणीही लागले. ग्रामस्थांचा वनवास मिटावा हीच भावना आहे.     - आशाबाई माढे

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईWaterपाणी