- अप्पासाहेब पाटील, सोलापूरटेंभुर्णी (सोलापूर) : उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून ७० हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने आषाढी वारीचा पार्श्वभूमीवर उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. शुक्रवारी (२० जून ) दुपारी ३ वाजता १ हजार ६०० कुसेक तर सायंकाळी ५ वाजता १० हजार क्यूसेक असा ११ हजार ६०० क्यूसेक सोडण्यात येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी सकाळी ९ वाजता ६३ टक्के पर्यंत पोहचली होती. त्यात सातत्याने वाढ होत आहे. उजनी धरणाची क्षमता पाहता आषाढी वारीचा पर्शवाभूमीवर महत्ववाचा निर्णय मानला जात आहे.
वाचा >>कुठे कमरेपर्यंत पाणी तर, कुठे दरड कोसळली; मान्सूनने महाराष्ट्र व्यापला!
पावसाळा आणखी चार महिने शिल्लक असल्याने पंढरपूर येथे पुढील काळात पुरस्थिती कायम राहणार आहे. दौंड येथील विसर्गात वाढ झाली असली तरी बंडगार्डन येथील विसर्ग सकाळी घटला आहे.
कोणत्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू?
बंडगार्डन येथून सकाळी ९ वाजता २४ हजार कुसेक होता. रात्री ३८ हजार कुसेक पर्यंत गेला होता. सकाळी त्यात घट झाली आहे. तर खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कायम असून १५ हजार ९२ क्यूसेक्स विसर्ग मुळा मुठा नदी पत्रात सोडण्यात येत आहे.
घोड धरणातून ४ हजाराचा विसर्ग कायम आहे. सध्या उजनी धरणात एकूण ९७ टीएमसी पाणीसाठा झाला असून ३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ७५ टक्के पर्यंत पाणी पातळी स्थिर ठेवण्याचे नियोजन उजनी धरण व्यवस्थापन करत आहे.