शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 18:04 IST

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली.

सोलापूर : काँग्रेसने जीवनात कधीच असा घमंड केला नाही. अजित पवारांना काय बोलायचं आहे, हे त्यांचे मत आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया देणे काही गरजेचे नसल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मोठा भाऊ असेल, या अजित पवाराच्या विधानावर बोलताना पटोले यांनी अजित पवारांना काय बोलायचं आहे, हे त्यांचे मत आहे. आमची मागच्या काळात मिटींग झाली आहे. मेरीटच्या आधारावर प्रत्येक ठिकाणी निर्णय होतील, असे सांगितले. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. 

दरम्यान, बीजेपी वाल्यांना माझा सवाल आहे. केरळ मधली गाय तुमची काय लागते. गोव्यामधील गाय तुमची काय लागते. नॉर्थ ईस्ट मध्ये तुमची गाय काय लागते. हे फक्त महाराष्ट्रातील जनतेला भाजपने प्रामाणिकपणे सांगावे, असा प्रश्न पटोले यांनी आशिष शेलार यांना केला. तसेच गाय तिथे खाणारी वस्तू आहे, तर इथे आई आहे. या पद्धतीचा धार्मिक तेढ निर्माण करून, वाद करून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. त्यामुळे तुमचा खरा चेहरा जनतेने ओळखला आहे. भाजपवाल्यांची गाय कधीच आई झाली नाही. गाईच्या नावाने भाजप राजकारण करते. गंगेच्या पाण्यासंदर्भात ही राजकारण करतात. त्यामुळे हिंदुत्वाचा जो बुरखा होता तो भाजपचा फाटला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यात हनुमानजी काँग्रेससोबत आले, रामजी काँग्रेससोबत आले आहेत. भाजपसाठी आता हिंदुत्व काही राहिली नाही, अशी टीका त्यांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल बोलताना पटोले यांनी म्हटले, "नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात स्वागत आहे. मोदी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा आहे. 2014 पासून त्यांनी जे आश्वासन दिले आहे, त्यासंदर्भात आता ते भाषण युट्युबवर व्हायरल  होत आहे. दोनशे कोटी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरकुल बांधण्याचे सांगितले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की नाही १४० कोटी जनता भारतीय आहे. मात्र घोषणा करूनही अजूनही असंख्य नागरिकांना घरं मिळाली नाही. महाराष्ट्रात मोदीजी जेवढे फिरतील तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे."

तसेच काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला असून  काँग्रेस पक्षच हा देशाला आणि राज्याला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. देश विकून देश चालवणाऱ्या भाजपला नागरिकांनी ओळखले आहे. संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते. राज्यात सध्या दररोज साठ ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचे दिसत आहे, पोलीस यंत्रणेवर दबाव आहे. राहुल गांधी यांनी नारा दिला आहे 'डरो मत' तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहे. महाराष्ट्र हा समता आणि बंधुत्वाचा, शाहू फुले यांचा महाराष्ट्र आहे. राज्यातील पोलीस कोणाच्या दबावात आहेत हा आमचा प्रश्न आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे, अकोला, छत्रपती  संभाजीनगर, नगर या ठिकाणी पोलीस दबावात होते. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारू. कोण आहे हा सूत्रधार जो महाराष्ट्रात धार्मिक दंगली घडवत आहे आज ना उद्या तो नागरिकांसमोर येईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.   

 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी