शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झोपेतच तीन चिमुकल्यांवर काळाचा घाला; ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात गमावले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:24 IST

या घटनेची माहिती मिळताच गावात सर्वत्र शोककळा पसरली अन् ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

माढा: आपल्या राहत्या कोपींच्या वसाहतीपासून उसतोडीसाठी भल्या पहाटे सहा वाजता ऊसतोड मजूर घेऊन निघालेला ट्रॅक्टर उसाच्या गाडीसह एका विहिरीत पडून कामगारांच्या अवघ्या तीन ते चार वर्षांच्या एकूण तीन मुलांचा झोपेत असतानाच त्या विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना दि. २ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिंगेवाडी (ता. माढा) येथे घडली. यात रिंकू सुखलाल वसावी (वय ३), आरव वसंत पाडवी (४), नितेश शिवा वसावी (३, सध्या सर्व रा. शिगेवाडी, ता. माढा) अशी विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत सुखलाल करमा वसावी (रा. पिंपळबारी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावात सर्वत्र शोककळा पसरली अन् ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुखलाल करमा वसावी हे पिंपळबारी (ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील रहिवासी असून, ते ऊसतोड कामगार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील पाडली (ता. धडगाव) येथील उसतोड मुकादम खिमजी जालम्या तडवी याने उसतोडणीसाठी फिर्यादीसह इतर ऊसतोड कामगारांची एक टोळी तयार केली होती. दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुकादम खिमजी याने ऊसतोडणीसाठी शिंगेवाडी येथे ऊसतोड कामगारांना आणले होते. शिंगेवाडी येथील नागनाथ कोंडिबा शिंदे यांच्या शेतात ते राहण्यास होते. २ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुकाराम मुरलीधर शिंदे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी असल्याने कानिफ मच्छिंद्र परबत (रा. शिंगेवाडी) यांचा एमएच-४५, एएल-४७५३ या ट्रॅक्टरला ट्रॅक्टरगाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी व फिर्यादीची पत्नी सायकू सुखलाल वसावी, त्याची मुलगी रिंकू, ऊसतोड जोडीदाराची पत्नी निमा शिवा वसावी, तिचा मुलगा नितेश शिवा वसावी व परमिला वसंत पाडवी व तिचा मुलगा आरव वसंत पाडवी यांना घेऊन निघाला होता. 

ट्रॅक्टर मुकादम खिमजी जालम्या तडवी हा स्वतः चालवत होता. या दरम्यान नागनाथ कोंडिबा शिंदे यांच्या शेतातील बिरोबा मंदिराजवळील विहिरीजवळ ट्रॅक्टर आला असता ट्रॅक्टरचालक मुकादम खिमजी याला शेतामध्ये विहीर असल्याचे माहिती असतानासुद्धा हयगयीने व धोकादायक ट्रॅक्टर चालविल्यामुळे ट्रॅक्टर गाडीसह विहिरीतील पाण्यात पडला. यावेळी प्रसंगावधान राखून ज्यांना पोहता येत होते ते पाण्याबाहेर पडले आणि महिलांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र, ट्रॅक्टरच्या हेडवर बसलेली लहान तीन मुले ही मात्र विहिरीतील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. यावेळी ट्रॅक्टरवरील चालक मुकादम खिमजी जालम्या तडवी हा अपघातानंतर विहिरीतून बाहेर येत घटनेचे गांभीर्य ओळखून पसार झाला. त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच मोटारी लावून २० फूट पाणी काढले 

घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेऊन एकूण पाच विद्युत मोटारींच्या साहाय्याने विहिरीत असलेले २० फूट पाणी बाहेर काढले आणि एका मोठ्या क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर व ट्रॅक्टरगाडी बाहेर काढली. ट्रॅक्टर गाडीसह विहिरीत पडून तब्बल बारा तास उलटल्यानंतर सदरच्या मृत पावलेल्या तीन मुलांवर कुईवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांना नंदुरबार येथील त्यांच्या घराकडे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात