शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ईश्वरीचिठ्ठी ठरली लकी; ग्रामपंचायत निवडणूकीत आजी व नातू विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:28 IST

माढा तालुक्यातील तडवळे येथील प्रकार; समसमान मते पडल्याने चिठ्ठीव्दारे झाली निवड

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर- एकहाती सत्ता मिळविण्यात राजकीय पक्षांना यश- निकालानंतर गावागावात जल्लोष व आनंदोत्सव

अमर गायकवाड

माढा : माढा तालुक्यातील तडवळे म येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये दोन जागेसाठी अतिशय चुरशीने मतदान झाले़ गावातील दोन्ही वार्डात असलेल्या प्रभागातील उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठीवर उमेदवारांचे भवितव्य ठरले़ यात आजी व नातू विजयी झाले़ यामध्ये प्रभाग क्रमांक एक़मधून दिनेश मोहन गिरी हे विजयी झाले आहे.

इयत्ता तिसरीमधील विद्यार्थी हर्षवर्धन संदीप काशीद याने ईश्वरी चिट्ठी काढली. तर वार्ड क्रमांक दोनमधून राजाबाई नामदेव गिरी विजयी झाल्या. किर्तिराज धैर्यशील भांगे इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्याने  ईश्वर चिठ्ठी काढली. चुरशीने झालेल्या मतदानात प्रभाग क्रमांक १ मधील दिनेश मोहन गिरी व सतीश दिलीप कुमार गोसावी यांना प्रत्येकी २१९ मते मिळाले आहेत. 

  वार्ड क्रमांक दोन मधील राजाबाई नामदेव गिरी व शिवकन्या धनाजी गिरी यांना प्रत्येकी १४८ मध्ये मिळाली़ बालाजी सुतार व आम्रपाली बालाजी सुतार या पती-पत्नीने ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ओबीसी प्रवर्गाच्या या दोन रिक्त जागेवर निवडणूक लागली होती. राष्ट्रवादी पुरस्कृत परबत गटाच्या पाच जागा होत्या व काका पाटील गटाच्या दोन जागा होत्या.

सुतार दांम्पत्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे दोन जागा रिक्त झाल्याने मागीलवेळी वेगवेगळे लढलेल्या शिवसेना व पाटील गट यांनी एकत्र येत परबत गटाला शह देण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही बाजूने समसमान मते पडल्याने ईश्वर चिट्टीचा फायदा परबत गटाला मिळाल्याने पुन्हा परबत गटाची सत्ता कायम राहणार आहे.

 सध्या परबत गटाचे सरपंच धनाजी परबत, विश्वनाथ परबत, बाळासाहेब परबत यांनी सत्ता कायम ठेवली आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी विजय लोकरे व विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदानSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय