शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘लोकमत’ बांधावर; झाडे करपली, टोमॅटो नासले; उरले केवळ बांबू अन् दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:56 IST

मोडनिंब परिसरातील स्थिती : कांद्याच्या पाती जळून वाढ खुंटली, शेतकरी संकटात

ठळक मुद्देखराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग  पडलाशेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके  जागीच जळून जात आहेतमोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला

मारुती वाघ

मोडनिंब : सध्या सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. मोडनिंब (ता़ माढा) परिसरातील पोपट पावणे या शेतकºयाच्या शेतात जाऊन पाहणी केली असता टोमॅटोच्या फडातील सर्व झाडे करपली होती, टोमॅटो नासले होते, परिणामी केवळ उभे बांबू आणि दोरीच दिसून आली.मोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला असला तरी या पावसाने शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले़ विशेषत: कांदा, टोमॅटो, ज्वारी, सिमला मिरची याचे नुकसान झाले आहे.

सध्या पाऊस थांबला असला तरी रोजच धुके पडत आहे़ खराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग  पडला आहे़ शेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके  जागीच जळून जात आहेत़    झाडांना फांद्याशिवाय एक पान राहिलेले दिसत नाही़ कांदा पिकाच्या पाती पूर्णपणे जळून गेल्यामुळे त्याची वाढ थांबलेली आहे, असे माऊली हागे या शेतकºयाने सांगितले.

अरण शिवारातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या पिकाची पाहणी केली असता दिलीप सोलंकर, विष्णू सोलंकर, शिवाजी इंगळे, नवनाथ इंगळे, राजू इंगळे हे शेतकरी म्हणाले, आम्ही अतिशय कष्टाने लावलेला व जोमदार आलेला कांदा केवळ खराब हवामान, धोक्यामुळे व रिमझिम पावसामुळे जागेवरच पिवळा झाला आहे़ परिणामी आता त्याची वाढ थांबली़ यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

द्राक्ष बागायतदार बबन वाघमारे म्हणाले, सध्या ढगाळ वातावरण आणि धुके पडून रोगराई पसरत आहे; मात्र बागेमध्ये   सगळीकडे पाणीच असल्याने फवारणी करता येत नाही़ त्यामुळे नुकसान होत आहे.

तरी प्रशासनाने मोडनिंब,अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, सोलंकरवाडी, बावी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पावसानं बुडाले अडीच लाख- मोडनिंब येथील शेतकरी पोपट पावणे म्हणाले, जमिनीची मशागत, शेणखत लागवड, खते, फवारणी, बांबू व तारा मजुरी यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाला़ आतापर्यंत ३ लाख रुपये उत्पादन मिळाले आहे़ अजून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन अपेक्षित होते; मात्र रिमझिम पाऊस व हवामान बदलामुळे धुके पडून टोमॅटोचे नुकसान झाले़ तसेच त्यांच्या शेजारील माऊली हागे, विजय वाघ याही शेतकºयांची करपा रोगाने पूर्णपणे झाडे जळून नुकसान झाले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी