शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ बांधावर; झाडे करपली, टोमॅटो नासले; उरले केवळ बांबू अन् दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:56 IST

मोडनिंब परिसरातील स्थिती : कांद्याच्या पाती जळून वाढ खुंटली, शेतकरी संकटात

ठळक मुद्देखराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग  पडलाशेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके  जागीच जळून जात आहेतमोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला

मारुती वाघ

मोडनिंब : सध्या सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. मोडनिंब (ता़ माढा) परिसरातील पोपट पावणे या शेतकºयाच्या शेतात जाऊन पाहणी केली असता टोमॅटोच्या फडातील सर्व झाडे करपली होती, टोमॅटो नासले होते, परिणामी केवळ उभे बांबू आणि दोरीच दिसून आली.मोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला असला तरी या पावसाने शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले़ विशेषत: कांदा, टोमॅटो, ज्वारी, सिमला मिरची याचे नुकसान झाले आहे.

सध्या पाऊस थांबला असला तरी रोजच धुके पडत आहे़ खराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग  पडला आहे़ शेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके  जागीच जळून जात आहेत़    झाडांना फांद्याशिवाय एक पान राहिलेले दिसत नाही़ कांदा पिकाच्या पाती पूर्णपणे जळून गेल्यामुळे त्याची वाढ थांबलेली आहे, असे माऊली हागे या शेतकºयाने सांगितले.

अरण शिवारातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या पिकाची पाहणी केली असता दिलीप सोलंकर, विष्णू सोलंकर, शिवाजी इंगळे, नवनाथ इंगळे, राजू इंगळे हे शेतकरी म्हणाले, आम्ही अतिशय कष्टाने लावलेला व जोमदार आलेला कांदा केवळ खराब हवामान, धोक्यामुळे व रिमझिम पावसामुळे जागेवरच पिवळा झाला आहे़ परिणामी आता त्याची वाढ थांबली़ यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

द्राक्ष बागायतदार बबन वाघमारे म्हणाले, सध्या ढगाळ वातावरण आणि धुके पडून रोगराई पसरत आहे; मात्र बागेमध्ये   सगळीकडे पाणीच असल्याने फवारणी करता येत नाही़ त्यामुळे नुकसान होत आहे.

तरी प्रशासनाने मोडनिंब,अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, सोलंकरवाडी, बावी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

पावसानं बुडाले अडीच लाख- मोडनिंब येथील शेतकरी पोपट पावणे म्हणाले, जमिनीची मशागत, शेणखत लागवड, खते, फवारणी, बांबू व तारा मजुरी यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाला़ आतापर्यंत ३ लाख रुपये उत्पादन मिळाले आहे़ अजून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन अपेक्षित होते; मात्र रिमझिम पाऊस व हवामान बदलामुळे धुके पडून टोमॅटोचे नुकसान झाले़ तसेच त्यांच्या शेजारील माऊली हागे, विजय वाघ याही शेतकºयांची करपा रोगाने पूर्णपणे झाडे जळून नुकसान झाले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी