शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ बांधावर; परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:52 IST

मंगळवेढा तालुका; ज्वारीच्या कोठाराला लागली दृष्ट; गतवर्षी पावसाअभावी पेरणी झाली नव्हती

ठळक मुद्देमंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागलीमंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडलापहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले

मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला; पण तो ठराविक अंतराने उघडीप द्यायचा.. पिकाला नुकसानकारक ठरत नसायचा.. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असायचा. यंदा परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला. हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे, असं बुजुर्ग मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना आपली व्यथा मांडली. ज्वारीचं कोठार समजल्या जाणाºया मंगळवेढा तालुक्याला यंदा दृष्ट लागल्याचेही निराशाजनक सूर उमटू लागले आहेत. काळ्या आईची मोठ्या अपेक्षेने ओटी भरली; पण गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने अक्षरश: आमच्या लक्ष्मीची माती झाली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने बळीराजाचे अश्रू आटले. त्याचा कुणी ठाव घ्यावा का, अशी काळजाला भिडणारी आर्त हाक भाळवणी येथील शेतकरी महादेव कांबळे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठची आठ ते दहा गावे सोडली तर तालुक्यातील उर्वरित गावात शेतीला पूरक पाण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने बागायती क्षेत्र फार कमी आहे. या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, तूर, मटकी, मका, सूर्यफूल तर रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, गहू, मका आदी पिके घेतली जातात.तालुक्यात ५१ हजार १७८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून, आजपर्यंत ४४ हजार १२० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जवळपास ८७ टक्के पेरणी झाली आहे. ज्या शेतकºयांनी कांदा काढला, तो पावसात भिजून सडून गेला तर रब्बीत लागवड केलेला कांदा सरीतील पाणी न हटल्याने पाण्याने करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पिकांचे गणित कोलमडले- मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागली आहे. मंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडला नाही, तरी निवळ थंडीवर परिपूर्ण येतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना काहीही अंदाज बांधता येत नसल्यामुळे तो मोठ्या संकटात सापडला आहे. 

परतीच्या पावसाने शेतकºयांचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. शेतकºयांना शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी. अनुदान देऊन उपयोग होणार नाही, महागडी औषधे फवारणी करून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पिके सडून गेली आहेत.- अनिल बिराजदार, शेतकरी सिद्धापूर

गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. कांद्याची रोपे सडून गेली आहेत. तीन वर्षे पाऊस नव्हता. यावर्षी झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.- समाधान शिरसट, शेतकरी ब्रह्मपुरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळRainपाऊस