शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

‘लोकमत’ बांधावर; परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:52 IST

मंगळवेढा तालुका; ज्वारीच्या कोठाराला लागली दृष्ट; गतवर्षी पावसाअभावी पेरणी झाली नव्हती

ठळक मुद्देमंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागलीमंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडलापहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले

मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला; पण तो ठराविक अंतराने उघडीप द्यायचा.. पिकाला नुकसानकारक ठरत नसायचा.. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असायचा. यंदा परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला. हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे, असं बुजुर्ग मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना आपली व्यथा मांडली. ज्वारीचं कोठार समजल्या जाणाºया मंगळवेढा तालुक्याला यंदा दृष्ट लागल्याचेही निराशाजनक सूर उमटू लागले आहेत. काळ्या आईची मोठ्या अपेक्षेने ओटी भरली; पण गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने अक्षरश: आमच्या लक्ष्मीची माती झाली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने बळीराजाचे अश्रू आटले. त्याचा कुणी ठाव घ्यावा का, अशी काळजाला भिडणारी आर्त हाक भाळवणी येथील शेतकरी महादेव कांबळे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठची आठ ते दहा गावे सोडली तर तालुक्यातील उर्वरित गावात शेतीला पूरक पाण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने बागायती क्षेत्र फार कमी आहे. या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, तूर, मटकी, मका, सूर्यफूल तर रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, गहू, मका आदी पिके घेतली जातात.तालुक्यात ५१ हजार १७८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून, आजपर्यंत ४४ हजार १२० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जवळपास ८७ टक्के पेरणी झाली आहे. ज्या शेतकºयांनी कांदा काढला, तो पावसात भिजून सडून गेला तर रब्बीत लागवड केलेला कांदा सरीतील पाणी न हटल्याने पाण्याने करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पिकांचे गणित कोलमडले- मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागली आहे. मंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडला नाही, तरी निवळ थंडीवर परिपूर्ण येतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना काहीही अंदाज बांधता येत नसल्यामुळे तो मोठ्या संकटात सापडला आहे. 

परतीच्या पावसाने शेतकºयांचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. शेतकºयांना शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी. अनुदान देऊन उपयोग होणार नाही, महागडी औषधे फवारणी करून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पिके सडून गेली आहेत.- अनिल बिराजदार, शेतकरी सिद्धापूर

गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. कांद्याची रोपे सडून गेली आहेत. तीन वर्षे पाऊस नव्हता. यावर्षी झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.- समाधान शिरसट, शेतकरी ब्रह्मपुरी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळRainपाऊस