शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘लोकमत’ बांधावर; पंढरपूर तालुक्यातील बळीराजावर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:11 IST

नशीब फुटलं.. खरबूज बुजलं..; कोर्टी येथे दोन एकरावरील पीक अतिपावसामुळे झाले खराब

ठळक मुद्देऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केलेमहिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकलेशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा

सतीश बागल 

पंढरपूर : ऐन पावसाळ्यात तीन महिने पाऊस नाही.. उजनी धरण भरलेलं असल्यानं कांदा, फळपिके घेतली. जेमतेम पाण्यावर उसाची लागवड केली. मात्र, परतीच्या पावसानं फटका दिला अन् होत्याचं नव्हतं झालं. कांदा शेतातच सडू लागला... जो त्यातून बचावला त्यावर करप्या रोगानं पछाडलं. या परतीच्या पावसानं शेतकºयांच्या साºया मेहनतीवर पाणी फिरवलं. 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा १२ सप्टेंबरला लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट माल पक्वतेच्या अवस्थेत होता. मल्चिंग पेपर, सुरक्षेसाठी प्लॉटभोवती जाळी, दोन रुपयाला एकप्रमाणे रोप खरेदी केलेले. एकूण सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. दि. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले. वातावरणात बदल झाला. खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली.

दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. एक रुपयाचेही उत्पन्न हाती आले नाही. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. कृषी सहायक, तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. परंतु गेल्या वर्षी बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी वेळेत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. 

उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. भंडीशेगाव हद्दीतील शेतात अडीच एकर ऊस लागवड केली आहे. पावसाचे पाणी साचून राहिल्याने उसाचे डोळे नासून गेले आहेत. त्या ठिकाणी पुन्हा लागवड करावी लागणार असल्याचे नागणे यांनी सांगितलं.

ऊस लागवडीसाठी केलेल्या सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे सांगितले. त्या शेजारी असणाºया नितीन बागल यांच्या शेतात काढून ठेवण्यात आलेले सोयाबीन सततच्या पावसामुळे खराब झाले आहे. आहे त्या अवस्थेत शेतात टाकून द्यावे लागले आहे. सध्या शेतात पाणी असून, रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी मशागत कधी करणार, शेताला वाफसा कधी येणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. 

होत्याचं नव्हतं झालं.. लवकर मदत मिळावी- ऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केले. महिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा भंडीशेगावच्या नितीन बागल, धर्मा येडगे, शिवाजी नागणे यांच्यासह अनेक शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळ