शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ बांधावर; पंढरपूर तालुक्यातील बळीराजावर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:11 IST

नशीब फुटलं.. खरबूज बुजलं..; कोर्टी येथे दोन एकरावरील पीक अतिपावसामुळे झाले खराब

ठळक मुद्देऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केलेमहिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकलेशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा

सतीश बागल 

पंढरपूर : ऐन पावसाळ्यात तीन महिने पाऊस नाही.. उजनी धरण भरलेलं असल्यानं कांदा, फळपिके घेतली. जेमतेम पाण्यावर उसाची लागवड केली. मात्र, परतीच्या पावसानं फटका दिला अन् होत्याचं नव्हतं झालं. कांदा शेतातच सडू लागला... जो त्यातून बचावला त्यावर करप्या रोगानं पछाडलं. या परतीच्या पावसानं शेतकºयांच्या साºया मेहनतीवर पाणी फिरवलं. 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा १२ सप्टेंबरला लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट माल पक्वतेच्या अवस्थेत होता. मल्चिंग पेपर, सुरक्षेसाठी प्लॉटभोवती जाळी, दोन रुपयाला एकप्रमाणे रोप खरेदी केलेले. एकूण सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. दि. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले. वातावरणात बदल झाला. खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली.

दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. एक रुपयाचेही उत्पन्न हाती आले नाही. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. कृषी सहायक, तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. परंतु गेल्या वर्षी बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी वेळेत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. 

उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. भंडीशेगाव हद्दीतील शेतात अडीच एकर ऊस लागवड केली आहे. पावसाचे पाणी साचून राहिल्याने उसाचे डोळे नासून गेले आहेत. त्या ठिकाणी पुन्हा लागवड करावी लागणार असल्याचे नागणे यांनी सांगितलं.

ऊस लागवडीसाठी केलेल्या सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे सांगितले. त्या शेजारी असणाºया नितीन बागल यांच्या शेतात काढून ठेवण्यात आलेले सोयाबीन सततच्या पावसामुळे खराब झाले आहे. आहे त्या अवस्थेत शेतात टाकून द्यावे लागले आहे. सध्या शेतात पाणी असून, रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी मशागत कधी करणार, शेताला वाफसा कधी येणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. 

होत्याचं नव्हतं झालं.. लवकर मदत मिळावी- ऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केले. महिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा भंडीशेगावच्या नितीन बागल, धर्मा येडगे, शिवाजी नागणे यांच्यासह अनेक शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळ