शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ बांधावर; पंढरपूर तालुक्यातील बळीराजावर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:11 IST

नशीब फुटलं.. खरबूज बुजलं..; कोर्टी येथे दोन एकरावरील पीक अतिपावसामुळे झाले खराब

ठळक मुद्देऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केलेमहिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकलेशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा

सतीश बागल 

पंढरपूर : ऐन पावसाळ्यात तीन महिने पाऊस नाही.. उजनी धरण भरलेलं असल्यानं कांदा, फळपिके घेतली. जेमतेम पाण्यावर उसाची लागवड केली. मात्र, परतीच्या पावसानं फटका दिला अन् होत्याचं नव्हतं झालं. कांदा शेतातच सडू लागला... जो त्यातून बचावला त्यावर करप्या रोगानं पछाडलं. या परतीच्या पावसानं शेतकºयांच्या साºया मेहनतीवर पाणी फिरवलं. 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा १२ सप्टेंबरला लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट माल पक्वतेच्या अवस्थेत होता. मल्चिंग पेपर, सुरक्षेसाठी प्लॉटभोवती जाळी, दोन रुपयाला एकप्रमाणे रोप खरेदी केलेले. एकूण सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. दि. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले. वातावरणात बदल झाला. खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली.

दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. एक रुपयाचेही उत्पन्न हाती आले नाही. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. कृषी सहायक, तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. परंतु गेल्या वर्षी बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी वेळेत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. 

उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. भंडीशेगाव हद्दीतील शेतात अडीच एकर ऊस लागवड केली आहे. पावसाचे पाणी साचून राहिल्याने उसाचे डोळे नासून गेले आहेत. त्या ठिकाणी पुन्हा लागवड करावी लागणार असल्याचे नागणे यांनी सांगितलं.

ऊस लागवडीसाठी केलेल्या सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे सांगितले. त्या शेजारी असणाºया नितीन बागल यांच्या शेतात काढून ठेवण्यात आलेले सोयाबीन सततच्या पावसामुळे खराब झाले आहे. आहे त्या अवस्थेत शेतात टाकून द्यावे लागले आहे. सध्या शेतात पाणी असून, रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी मशागत कधी करणार, शेताला वाफसा कधी येणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. 

होत्याचं नव्हतं झालं.. लवकर मदत मिळावी- ऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केले. महिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा भंडीशेगावच्या नितीन बागल, धर्मा येडगे, शिवाजी नागणे यांच्यासह अनेक शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळ