शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत बांधावर’; कांद्यात शिरलं पाणी अन् होत्याचं नव्हतं झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:57 IST

बार्शी तालुका ; घोकला होता भाव सहा हजार, हाती आला नासका कांदा

ठळक मुद्देबार्शी तालुक्यात कांदा आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले शासनही आता  कुठे हलले असून, पंचनामे करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरूबघूया कधी मदत मिळतेय, अशी बोलकी प्रतिक्रिया बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : यावर्षी पावसाळ्यात अल्प पाऊस पडला़ चला म्हटले आपल्याकडे थोडेसे पाणी आहे. कांद्याला दरही चांगला आहे. कांदा लावू म्हणून दोन एकरावर कांदा लावला़ खते टाकून दुहीच्या फवारण्या करून तो चांगल्या पद्धतीने जोपासला. कांदा काढायला आला आणि इकडे परतीचा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली़  हा पाऊस कमी की काय म्हणून २० आॅक्टोबरला चांदणी नदीला मोठे पाणी आले व हे सर्व पाणी कांद्याच्या पिकात शिरले. संपूर्ण कांदा हा जागेवरच नासला. डोळ्यात अश्रू आणत कांदलगावच्या बालाजी शिनगारे या शेतकºयानं आपली व्यथा सांगितली.

बालाजी यांना जेमतेम अडीच एकर जमीऩ दरवर्षी ते कांदा, तूर अशा पिकांचे उत्पादन घेतात़ यावर्षी त्यांनी अतिशय उत्तम  पद्धतीने  कांदा जोपासला होता़  यंदा कांद्याला दरही चांगला होता़ चांगले पैसे झाले असते. मात्र नियतीला ते मान्य नसावे़ आम्हाला परतीचा पाऊस एवढा पडेल, असे कधीच वाटले नव्हते़ मात्र तो इतका पडला की आमचे मोठे नुकसान करून गेला.

 ज्यावेळी आम्ही शिनगारे यांच्या शेतात गेला तेव्हा ते कांद्याच्या पिकात अक्षरश: धाय मोकलून रडत होते़ आमचे इकडे नुकसान झालंय अन् या पुढाºयांना सरकारचे पडलंय असे म्हणत ते शेतातील एक-एक कांदा उपटून दाखवत होते. तेव्हा प्रत्येक कांदा हा नासलेला दिसत होता़ वरून पात तर हिरवीगार दिसत होती़ मात्र आतून कांदा जादा पाणी लागल्याने नासून गेला होता.

सरकारच्या नावाने खडे...- मुख्यमंत्री तर कोणीही होईल हो, पण एक दिवसाचा शेतकरी होऊन पाहा, असे म्हणून सरकारच्या नावाने खडे फोडले़ शिनगारे यांना या कांद्यापासून एक रुपयाचे देखील उत्पन्न मिळणे शक्य नाही़  बार्शी तालुक्यात कांदा आणि सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ प्रशासनही आता  कुठे हलले असून, पंचनामे करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे, बघूया कधी मदत मिळतेय, अशी बोलकी प्रतिक्रिया बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसdroughtदुष्काळ