शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

लॉकडाऊन : वंचित मुलांच्या शिक्षणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

राज्यात शाळा ऑनलाइन भरणार असा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे. घरी राहून शिक्षण ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य सरकारने ...

राज्यात शाळा ऑनलाइन भरणार असा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे. घरी राहून शिक्षण ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य सरकारने काही संसाधनाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. सद्य:स्थितीमध्ये इयत्ता पहिली ते १०वी साठी मराठी, हिन्दी, इंग्रजी व उर्दू भाषेमधील ९ हजारांपेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

लॉकडाऊनमुळे देशातील नव्हे तर, जगभरातील शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यंदा ज्या मुलांनी दहावी किंवा बारावीत प्रवेश केला आहे, यासाठी राज्य सरकारच्यावतीने शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाइन उपलब्धही करून देण्यात आली आहे. मात्र, भारतासारख्या देशात हा पर्याय सगळ्याच मुलांसाठी लागू होऊ शकत नाही. अतिदुर्गम भागात आजही एक किंवा दोन शिक्षकांवर शाळा चालविली जाते. ज्यात गावांमध्ये धड रस्ते नाही, विजेची पुरेशी सोय नाही, अशा मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण कितपत उपयोगी ठरणार आहे, याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग पुरेशा सुविधांअभावी देशात किंवा राज्यात फारसा लागू होऊ शकत नाही. १ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांची माहिती संकलित केल्यानंतर त्यातील अवघ्या २७ टक्केच विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भिस्त ठेवून सुरू असणारे नियोजन अनेक विद्यार्थ्यांना वंचित ठेवत असल्याचे दिसत आहे. सध्याच्या काळात ग्रामीण पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता स्मार्टफोनची संख्या वाढायची शक्यता कमी दिसते.

भविष्यात लॉकडाऊनचा काळ वाढत गेल्यास स्मार्टफोनऐवजी टीव्ही किंवा रेडिओ हे शिक्षणाचे चांगले माध्यम असू शकेल. कोरोना आणि कोरोनानंतरच्या काळात शिक्षणाचा आणि अभ्यासाचा नव्याने विचार करायची संधी यानिमित्ताने मिळाली असून, अलीकडेच तयार करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या ‘थिंक टंक’सहित विविध तज्ज्ञांनी, शिक्षकांनी एकत्र येऊन नवा विचार करण्याचे आवाहन राज्यातील एटीएफतर्फे संयोजक भाऊसाहेब चासकर यांच्यामार्फत केले आहे.

कोरोना महामारीमुळे भारतात ऑनलाइन शिक्षण पद्धतीला भविष्यात चांगल्या संधी असतील ही एक बाजू खरी असली तरी, दुसरी बाजू पाहिली तर देशातील एक मोठा वर्ग, समुदाय या शिक्षण हक्कापासून दुरावला जाईल. आधीच देशात शाळाबाह्य मुले, बाल कामगार, बाल विवाहाचे प्रमाण, गरिबी यामुळे अनेक मुलांना त्यांचे मूलभूत हक्कही मिळत नाही. यात कोरोनाची भर पडली आहे. म्हणून लॉकडाऊनच्या काळात आणि पोस्ट लॉकडाऊन शिक्षण हक्क अबाधित राखणे यावर मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे.

- जनार्दन वाघमारे (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)