शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्यांचा घोळ संपेना; दिवाळीनंतरही खात्यात पैसे जमा होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 16:56 IST

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी मिळाले २७ कोटी ४८ लाखांचा निधी

लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी

माढा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं व त्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या पुरामुळे ११७ गावातील ४३ हजार ९१३ हेक्टर शेतीचे क्षेत्र बाधीत झाले होते. त्याचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई म्हणून २७ कोटी ४८ लाख ७३ हजार १०० रुपयांचा अनुदान निधी दिवाळी पूर्वी माढा तहसीलाला जमा केला होता.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ते बँकेद्वारे थेट वर्ग करा म्हणून सूचनाही दिल्या होत्या. पण निधी उपलब्ध झाल्यानंतर लगेच दिवाळीत सलग सुट्या आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची याद्या फायनल झाल्या नाहीत. त्यातच बँकेला सलग सुट्या आल्याने जरी याद्या झाल्या तरी पैसे खात्यावर वर्ग करणार कोण हा प्रश्न निर्माण झाल्याने आतापर्यंत तहसील कार्यालयात याद्याचा घोळ संपला नाही. त्यामुळे दिवाळी अगोदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आलेला निधी दिवाळी नंतरही अद्यापपर्यंत खात्यावर मिळाला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पैसे लवकर येतील म्हणून बाजारपेठेत उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्ग नुकसान भरपाई कधी खात्यावर जमा होणार म्हणून वाट पाहत बसला आहे.

 माढा तालुक्यातील ११७ गावात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता.त्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील माती देखील विविध प्रकारच्या पिकांबरोबर वाहून गेली होती.त्यात नदी व ओढ्या-नाल्यालगतच्या फळबागा व विविध पिकांचे तर खूप मोठे नुकसान झाले होते.त्यात अनेक घरांची पडझड झाली होती.अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली होती तर काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्याचे शासकीय स्तरावरील गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमार्फत संबधीत नुकसानीचेपंचनामे केले होते.यावर  विविध संघटनांनी शासनाकडे त्वरित नुकसान भरपाईचे अनुदान द्यावे अशी मागणी सरकारकडे केली होती.त्यामुळे शासनाने माढा तालुक्यातील एकूण नुकसान भरपाई अनुदानाच्या निम्म्या हप्त्यापोटी दिवाळी अगोदर निधी तहसीलाला जमा केला होता.त्यामुळे तहसील खात्यात शासनाकडून २७ कोटी ४८ लाख ७३ हजार १०० रुपयांचा निधी नुकसान भरपाई देण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

 निधी जमा झाल्याबरोबरच तहसीलदार राजेश चव्हाण यांनी नुकसानीत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी करणे सुरू केले होते. व दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या  खात्यात रक्कमा जमा होतील असे सांगितले होते. परंतु  सुट्या आल्याने त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करता आली नाही. 

शेतकऱ्यांना जिरायत व आश्वाशीत सिंचनाखाली प्रतिहेक्टरी १० हजार व बहुवार्षिक पिकांना २५ रुपये हजार हेक्टरी मदत दिली जाणार असून लवकर त्यांच्या बँक  खात्यात अनुदान भरपाई पैसे जमा होतील असे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्रDiwaliदिवाळी