शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बाष्पीभवनामुळे उजनीतील पाणी प्रतिदिन एक टक्का होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:28 IST

सोलापूर जिल्ह्यात टंचाईचे संकेत; नियोजन कोलमडल्याने एप्रिलमध्ये मायनस ३२.५३ टक्क्यांवर !

ठळक मुद्देउजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर, एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहेउपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे, एकूण टीएमसी ४६.२३.गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता

भीमानगर : नियोजनाअभावी उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली असून, यामुळे धरण उघडे पडलेले दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांत आणि एप्रिलमध्येच मायनस ३२.५३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे, शेतकºयांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोल्यासह अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत असून, या पाण्यातून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेलनी तर मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. 

कालवा व बोगद्याचे तोंड बंद पडले असून, आता पाणीच नसल्यामुळे कालवा व बोगद्याकाठच्या शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडल्यानंतर धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे. 

गतवर्षी प्लस २१.८३ टक्के पाणीसाठा- उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे तर उपयुक्त टीएमसी मायनस १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ