शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

महानेत्याच्या विधानामुळे गावोगावी दंगली पेटल्या, कोरेगाव-भीमाप्रकरणी चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 5:03 AM

'कोरेगाव भीमामध्ये भाजपचा हात होता की काँग्रेसचा हे एनआयएच्या चौकशीतून पुढे येणार आहे'

सोलापूर : कोरेगाव भीमा येथे एक तारखेला दंगल झाली आणि दोन तारखेला सकाळी राज्यातील महानेत्याला शोध लागला की यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे गावोगावी दंगली पेटल्या, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.पाटील म्हणाले, कोरेगाव भीमामध्ये भाजपचा हात होता की काँग्रेसचा हे एनआयएच्या चौकशीतून पुढे येणार आहे. ही समिती यात आणखी कुणाकुणाचा हात होता हे पुढे तपासणार आहे.आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. उलट गेल्या पाच वर्षात आम्ही जे जे केले त्याची तुम्ही चौकशी करा. नुसत्या बढाया कशाला मारता. शहरी नक्षलवाद सिद्ध झाला आहे. बऱ्याच जणांची नावे समोर येतील, असेही ते म्हणाले.महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा हात असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. त्यावर पाटील म्हणाले, गांधींच्या हत्येनंतर या देशात अनेक कमिशन्स स्थापन झाली. त्या काळातील सर्व कमिशनच्या चौकशीतून हे पुढे आले की यात संघाचा हात नव्हता. आता तुम्हाला आणखी कमिशन स्थापन करायची असतील तर करा.मुस्लिम आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे. मुस्लिमांमध्ये गरीबी आहे. खरे तर दोन किंवा दहा टक्के मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळणे राहिले आहे.धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद आपल्या घटनेत नाही. आंध्र सरकारने देण्याचा प्रयत्न केला पण कोर्टात ते टिकले नाही, असेही पाटील म्हणाले.‘सारथी नव्हे तर पारथी काढा’महाआघाडी सरकार लोकांच्या कल्याणाच्या चांगल्या योजना बंद करीत आहे. मराठा समाजातील मुलांसाठी काढलेली सारथी संस्था बंद पाडली जात आहे. तुम्हाला काढायची असेल नवीन पारथी संस्था काढा. पण समाजातील मुलांवर अन्याय करु नका, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील