शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:48 PM

संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही.सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : उजनीतील पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन केले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयातील पाणी जरी संपले असले तरी चिंचपूर बंधाºयात सोलापूर शहराला २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक असल्याचा अहवाल पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही. सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. उजनी धरणात सध्या १०४ टक्के पाणीसाठा आहे. उजनीतील  उपलब्ध पाण्याचे पुढील दोन वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील वर्षी जरी पाऊस झाला नाही तरी शेतीला आणि पिण्याला पाणी कमी पडू नये असे नियोजन करण्यात आलेले आहे. उजनी भरलेले आहे म्हणून पाणी सोडा असे नसते.  आत्ता असलेल्या पाण्याचे जर नियोजन करून वापर केला तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करत शहराच्या पाणीपुरवठ्याबरोबरच शेतीच्या पाण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले हे सतत संपर्कात आहेत.  मीही रोजच्या रोज पाणीपुरवठ्याची माहिती घेत आहे. त्यामुळे सोलापूर शहराला एक थेंबही पाणी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.औज बंधाºयातील पाणी पातळी जरी शून्यावर गेली असली तरी चिंचपूर बंधाºयात २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक आहे. पालिकेचे अधिकारीही पाण्याचा अपव्यय टाळत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी झटत आहेत. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकळी इंटेकवेल इथे पाच फूट पाणी आहे,तर चिंचपूर बंधाºयाची पातळी  एक मीटर असल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. -----------------------उजनी धरणात १०४ टक्के पाणी असले तरी त्याची उधळपट्टी करणार नाही. किंवा पाण्यासाठी जिल्हा तडफडू देणार नाही. पुढील वर्षी पाऊस झाला नाही तरी पाणी कमी पडणार नाही या पध्दतीने  उजनीतील पाण्याचे नियोजन केले  असून जनतेने विनाकारण पाण्याची उधळपट्टी करु नये. पाणी काटकसरीनेच वापरावे. -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख