शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बचतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १०० गावात ‘जलजागृती’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:58 IST

सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले.सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या ...

ठळक मुद्देपाण्याच्या बचतीसाठी शेतकºयांचे प्रबोधनसोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार

सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले.

सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला असून ५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार आहे. ऊस क्षेत्र अधिक असलेली गावे या अभियानासाठी निवडली असून या गावात मोबाईल व्हॅनद्वारे जलदूत शेतकºयांशी संवाद साधणार आहे. पाटाणे पाणी दिल्याने वाया जाणारे पाणी, ठिबक व स्प्रिंकलरमुळे वाचणारे पाणी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळते, यासाठीची माहिती दिली जाणार आहे. जलजागृती अभियानाविषयी  या गावातील शेतकºयांच्या प्रतिक्रिया नाबार्डला जलदूत पाठविणार आहे.

कृषी अधिकारी व साखर कारखान्यांची यासाठी मदत घेतली जाणार असून यासाठी कार्यशाळाही घेण्यात आली असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले. या जलजागृती अभियानासाठी सोलापूर, लातूर, वाशीम, अहमदनगर, कोल्हापूर,  सांगली, बीड, अमरावती, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

ठिंबक सिंचनाचा वापर करावा- सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणासह भीमा व सीना या प्रमुख नद्या याशिवाय मध्यम व लघू प्रकल्पामुळे शेतीला पाणी मिळण्याची सुविधा आहे. मुबलक पाणी असलेल्या व भागातील शेतकरी शासन आदेशालाही न जुमानता पिकांना मुबलक पाणी देत आहेत. यामुळेच नाबार्डने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. अधिकाधिक शेतकºयांनी ठिबकचा वापर करावा, हा यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईSugar factoryसाखर कारखाने