शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पाण्याच्या बचतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १०० गावात ‘जलजागृती’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:58 IST

सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले.सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या ...

ठळक मुद्देपाण्याच्या बचतीसाठी शेतकºयांचे प्रबोधनसोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार

सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले.

सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला असून ५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार आहे. ऊस क्षेत्र अधिक असलेली गावे या अभियानासाठी निवडली असून या गावात मोबाईल व्हॅनद्वारे जलदूत शेतकºयांशी संवाद साधणार आहे. पाटाणे पाणी दिल्याने वाया जाणारे पाणी, ठिबक व स्प्रिंकलरमुळे वाचणारे पाणी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळते, यासाठीची माहिती दिली जाणार आहे. जलजागृती अभियानाविषयी  या गावातील शेतकºयांच्या प्रतिक्रिया नाबार्डला जलदूत पाठविणार आहे.

कृषी अधिकारी व साखर कारखान्यांची यासाठी मदत घेतली जाणार असून यासाठी कार्यशाळाही घेण्यात आली असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले. या जलजागृती अभियानासाठी सोलापूर, लातूर, वाशीम, अहमदनगर, कोल्हापूर,  सांगली, बीड, अमरावती, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

ठिंबक सिंचनाचा वापर करावा- सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणासह भीमा व सीना या प्रमुख नद्या याशिवाय मध्यम व लघू प्रकल्पामुळे शेतीला पाणी मिळण्याची सुविधा आहे. मुबलक पाणी असलेल्या व भागातील शेतकरी शासन आदेशालाही न जुमानता पिकांना मुबलक पाणी देत आहेत. यामुळेच नाबार्डने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. अधिकाधिक शेतकºयांनी ठिबकचा वापर करावा, हा यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईSugar factoryसाखर कारखाने