शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

नवरात्र उत्सवात होतोय जगदंबेचा जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:09 PM

संपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जाते. तो हा आजचा दिवस.

ठळक मुद्दे नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जातेसंपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवसवेगवेगळ्या रूपानं शक्ती स्वरूपिणी मातेची वेगवेगळ्या नावाने, रूपाने भारतीयाने पूजा

भारतीय सणांच्या मुळाशी एक विचार असतो. विशिष्ट ऋतुमानाच्या परिवर्तनासोबत अव्यक्त, अनाकलनीय शक्तीची, ऊर्जेची पूजा बांधण्याची, तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची भक्ती भावना असते. जिच्यामुळे जीवमात्रांचे अस्तित्व आहे. त्यांचं भरण-पोषणही तीच करते. य:कश्चित जीवानं त्या विराटाची पूजा बांधत असताना तिचं प्रतीक म्हणून ओंजळभर माती आणून देव्हाºयावर सुक्या पानाच्या पात्रात विविध धान्यं पेरून थोडंसं पाणी शिंपून, त्यात ओल रहावी म्हणून मधोमध मातीचा छोटासा ‘घट स्थापून’ त्यात पाणी भरून संपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जाते. तो हा आजचा दिवस.

भारत हा कृषिप्रधान देश. कृषक हा धरणीमातेला, शेतीला, जमिनीला माता म्हणतो. ‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीपस्ति.’ देवत्व-दिव्यत्व हे मातृरूपात पाहिलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर वैष्णोदेवीपर्यंत उभ्या-आडव्या विशाल भारतात वेगवेगळ्या रूपानं शक्ती स्वरूपिणी मातेची वेगवेगळ्या नावाने, रूपाने भारतीयाने पूजा केली आहे.

आदिशंकराचार्याने अव्यक्त रूपास माता पार्वती, अन्नपूर्णा म्हणून संबोधलं. रामकृष्ण परमहंसांनी कालीच्या रूपात आराधना केली. शारदीय नवरात्र महोत्सवाचे आता उत्सवी रूप दिवसेंदिवस अधिक प्रदर्शनीय होत चाललं आहे. बंगालमध्ये हा नवरात्रोत्सव अत्यंत दर्शनीय असतो, तो पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येतात. गुजरातमध्ये गरबा नृत्य अत्यंत प्रसिद्ध आहे. कर्नाटकात चामुंडेश्वरीचा नवरात्रोत्सव.

म्हैसूर राजाचा दसरा दरबार त्या काळापासून लोकशाहीतल्या वर्तमान काळीही ते वैभव पाहायला लोक आजही जातात. महाराष्टÑात तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरगड तसेच अंबाजोगाई, सप्तशृंगीची मातेची रूपं चैतन्यदायी अशी आहेत. आश्विन मासातील नवरात्रीत सर्व शक्तीपीठात आईचा जागर मांडला जातो. अत्यंत कडक उपवास केले जातात. अनवाणी भक्त आपल्या राहत्या गावापासून आईच्या मंदिरापर्यंत पायी चालत जातात. तुळजापुरात मी काही वर्षे नोकरीनिमित्त होतो. कोजागरीच्या दिवशी मी पाहिलं की आख्खं गाव हे जागं होतं.

आईच्या नावानं गायिली जाणारी भक्तीगीतं, जळणारे पोत, वाद्यांचा, तुणतुण्यांचा टणत्कार, भोप्यांचे कुंकवाने भरलेले कपाळ, रस्त्याने भक्तिभावाने बसलेल्या भक्तांच्या भरलेल्या पिठानं परड्या, आकाशातला कोजागरीचा चंद्र जितका सुंदर तितक्याच पोताच्या प्रकाशात भरलेल्या पिठानं दिसणाºया परड्यादेखील भक्तिभावानं अधिक आकर्षक दिसत असत. ही माता भगवती नित्य शाश्वत आहे. तीच चराचरात भरुन उरली आहे. मानव तसेच देवतांच्या सहायार्थ ती वेळोवेळी अनेक रुपात प्रकट होते. नित्य असून ही ती प्रकट झाली असे म्हणण्याचा प्रघात आहे. दुर्गासपृशतीत म्हटले आहे-नित्यैव सा जगन्मूर्तिस्तया सर्वमिदं ततम्।।तथापि तलामुत्पत्तिर्बहुधा श्रूयतां मम।देवानां कार्य सिद्धयमाविर्भवति सा यदा।।उत्पन्नेति तदा लोके सा नित्याभिधीयते।(दुर्गा सपृशती-१/६४-६६)चला आज अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत या शक्ती स्वामिणी, तुमच्या माझ्या सर्वचराचर असण्याला कारण असणाºया जगत्मातेचा जागर मांडू या. तिच्या विषयी कृतज्ञता नम्र भावे मांडू या. -डॉ. इरेश स्वामी(लेखक माजी कुलगुरू आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्री