शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 16:31 IST

मोहन दाते; २५ आॅक्टोबर रोजी होणार दसरा साजरा

ठळक मुद्देदुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवनवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जातेशनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक

सोलापूर : दुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव १७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २५ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे. या वर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये २३ आॅक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, उर्वरित महाराष्ट्रामध्ये २४ आॅक्टोबर रोजी महाअष्टमी उपवास करावा, असेही दाते यांनी सांगितले आहे.----------नवरात्रीच्या नवव्यादिवशी दसरा...दरम्यान, मंगळवार २० आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी, २३ आॅक्टोबरला महालक्ष्मी पूजन, २४ रोजी महाअष्टमीचा उपवास, २५ आॅक्टोबर रोजी रविवारी नवरात्र समाप्त होणार असून, याचदिवशी दसरा साजरा होणार आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसºयापर्यंत नऊ दिवस किंवा दहा दिवसांचे अंतर असते. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झाल्याचे दाते यांनी सांगितले़------------देवी उपासनेचा काळ...हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. नवरात्र उत्सवाची सुरुवात उद्या (शनिवार) आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रं म्हटली जातात. या घटासमोर बसून उपासना करणा?्यांचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन् समाधान लाभते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीAdhyatmikआध्यात्मिक