शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

भारताची अर्थव्यवस्था जगात तिसºया स्थानावर पोहोचेल : शैलेंद्र देवळाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:34 PM

२०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल

ठळक मुद्देआज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केलीचांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत  १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़

सोलापूर : आर्थिक धोरणासाठी परिपक्व होण्यासाठी साधारणत: ३० वर्षे लागतात़ चीनने आपली आर्थिक नीती ही १९८१ मध्ये सुरू केली. यामुळे आता जगातील मार्केटमध्ये सध्या चीनी वस्तू दिसत आहेत. भारताने आर्थिक धोरणासाठी १९९१ मध्ये नीती सुरू केली.  आता भारत परिपक्वतेच्या उंबरठ्यावर थांबला आहे. यामुळे २०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल. भारतीय अर्थव्यवस्था ही जगात तिसºया स्थानी पोहोचेल़ पहिल्या क्रमांकावर चीन त्यानंतर अमेरिका आणि तिसºया स्थानी भारत असेल असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ़ शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ. देवळाणकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणासाठीची आतापर्यंत ७५ देशांचे ९० दौरे केले आहेत. आतापर्यंत एवढे दौरे कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी केले नाही असे सांगितले जाते़ यामुळे त्यांच्या दौºयावर किती खर्च झाला याची माहिती माहिती अधिकार खाली मागितली जात आहे़ ती रक्कम जवळपास २५० कोटीपर्यंत आहे. पण या रकमेची तुलना अमेरिका, चीन आणि जपानचे राष्टÑाध्यक्षांची तुलना केल्यास त्यांच्या १० टक्के ही हे दौरे नाहीत.

चांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत.  १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़ पण आज परिस्थिती बदलली आहे़ आज आपण आपल्या शेजारी देशांनाही मदत करत आहोत़ याच बरोबर जागतिक बँकेलाही आपण पैसे देत आहोत़ दहा वर्षात विकास दर वाढत आहे़ आज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केली आहे. 

७० टक्के तेल आखातातून- आज अमेरिका आणि आखाती देशात जी युद्धजन्य परिस्थिती आहे़ याचा परिणाम आपल्यावर होत आहे. कारण आपल्या देशाला जेवढे पेट्रोल आणि डिझेल लागते यातील ८५ टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते़ या ८५ टक्क्यांपैकी जवळपास ७० टक्के तेल हे आखाती देशामधून आयात केले जाते. तेथील तणावाच्या परिस्थितीमुळे आज बॅरेलचे दर वाढत आहेत़ तेथे एक  पैशाची जरी वाढ झाली तर कोट्यवधीचा फटका आपल्याला बसतो़ असे मत यावेळी डॉ़  देवळाणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरIncome Taxइन्कम टॅक्सIndiaभारत