शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सोलापूर जिल्ह्यात ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले; पाऊस चांगला पडला तर गाळपाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 15:38 IST

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा ...

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा परिणाम ऊसवाढीवर नक्कीच होत असला तरीही सरत्या गाळप हंगामाप्रमाणेच उच्चांकी गाळप जिल्ह्यात होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत आहे. २००० नंतर एकापाठोपाठ एक असे साखर कारखाने उभारणी झाले. उजनी धरण तसेच गरजेनुसार विविध ठिकाणी झालेले मध्यम, साठवण व लघु तलाव, ओढे-नाल्याची खोदाई व त्यावरील बंधारे, याशिवाय जिल्हाभरात झालेल्या पाणी अडविण्याच्या कामामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळेच ऊसक्षेत्रात वरचेवर वाढ होत आहे. यामुळेच सरत्या हंगामात ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालला व राज्यात उच्चांकी गाळपाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली.

पुढील वर्षाच्या गाळपासाठी बंद असलेल्यापैकी एक- दोन साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यापुढेही पाऊस चांगला पडत राहिला तर उसाची वाढ जोरात होईल व टनेज वाढेल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

म्हणूनच ऊस लागवडीकडे कल

ढोबळी मिरची फेकून द्यावी लागली, द्राक्ष जागेवरच टाकावी लागली, टोमॅटो, कांदा शेतकऱ्यांना परवडला नाही. ज्वारी, गहू व इतर धान्याचे यापेक्षाही हाल सुरु आहे. मग शेतकऱ्यांनी करायचे तर कोणते पीक?, मागील काही वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता ऊसतोडणीसाठी थोडा त्रास होईल मात्र बिनबोभाट ऊस जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढलाय. त्यामुळेच जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.

चौकट

वर्ष ऊस क्षेत्र (हे.)

  • २०१७-१८ १,५३,५६८
  • २०१८-१९ १,०४,०८६
  • २०१९-२० १,२८,९७९
  • २०२०-२१ १,७१,००१
  • २०२१-२२ २,३०,०५०
  •  

( दोन वर्षांतील तालुकानिहाय ऊस क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • तालुका २०-२१ २१-२२
  • उत्तर सो. ४०.११ ५२.०३
  • दक्षिण सो. ११०.६८ ११८.६७
  • बार्शी १९.६८ ७३.२०
  • अक्कलकोट१८७.९८ २१५.१७
  • मोहोळ २७९.७४ २२५.९४
  • माढा १७९.४२ ३४९.४७
  • करमाळा १९५.८९ ३७३.८७
  • पंढरपूर ३२७.२१ ४६२.७८
  • सांगोला ३१.४४ ४७.०९
  • माळशिरस २३०.२० २५३.७९
  • मंगळवेढा १०७.६६ १२८.४०
  • एकूण १७१००० २३००००

 

जिल्ह्यात जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने व मागील दोन वर्षे पाऊस चांगला पडल्याने जमिनीत पाणी जिरले आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्र ऊस वाढला आहे. यापुढे पाऊस चांगला पडला उसाची वाढ होईल व वजन वाढेल.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस