शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

युती होणार का या फालतू चर्चेत जात नाही, आमचा निर्णय झालाय! - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:39 PM

देशातील पाच राज्यात भाजपाचा सुफडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत.

सोलापूर -  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. पंढरपूरच्या या मैदानात सभा घेण्याचं धाडस शिवसेनेनं दाखवलंय, असे म्हणून उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  देशातील पाच राज्यात भाजपाचा सुपडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत. अयोध्येतही मी झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला गेलो होतो अन् पंढरपुरातही मी त्याच्यासाठीच आलो आहे. कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही, अशा शब्दात भाजपा अन् मोदींना उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं.  तसेच शेतकरी कर्जमाफी, राम मंदिर, मल्ल्या, नीरव मोदी, आगामी युतीसह इतरही मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन

समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.

धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी. 

कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो. 

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच 

जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो

सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार

राम मंदिर दिखेगा कब ?

बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर  कुंभकर्णासारखे लोळताय ?

सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत

30 वर्षे होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे?

हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही

राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल.

राम मंदिराबाबत नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे ?

जे नितीश संघमुक्त भारत करायला निघाले होत त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलंय.

नितीशकुमार आणि रामविलास यांच्यापुढे भाजपने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे.

शेतकरी हा काही मल्ल्या, मोदी नाही.

गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा.

गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल

शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे

पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफी झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा

मी सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय?

मला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे

काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?

देवांच्या नावाने जुमला केलात तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सुटू देणारही नाही

महाराष्ट्रावरचं संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारणासाठी पांडुरंग पाहिजे तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल.

शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे, आणणारच

छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, याला म्हणतात धाडस आणि हे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPandharpurपंढरपूर