शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 8:29 AM

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम; वसुलीवरही परिणाम, संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान

ठळक मुद्देकलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : कोरोना व्हायरसने देशभर आपली पाळेमुळे पसरली आहेत.  त्याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली़ सर्वच क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला़ असाच एक उद्योग असलेल्या ४० बँका, पतसंस्था, फायनान्स व मल्टीस्टेट यांची पिग्मी (दैनंदिन ठेव) गोळा करणाºया शहर व तालुक्यातील सुमारे ३०० एजंटांना फटका बसला आहे़ या काळात सुमारे चाळीस कोटी रुपये कलेक्शन बुडाले आहे़ 

बार्शी शहर हे सुरुवातीपासूनच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते़ याठिकाणी केवळ शहर व तालुकाच नव्हे तर निम्मा उस्मानाबाद जिल्हा, अहमदनगरचा काही भाग आदी ठिकाणाहून किराणा व इतर माल खरेदीसाठी नागरिक व छोटे-मोठे व्यापारी येतात़ त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते़ बार्शी शहरात १३ पतसंस्था, १५ सहकारी बँका, तीन मल्टीस्टेट सोसायटी, ४ निधी फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा चाळीस पेक्षा जास्त संस्था आहेत़ या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगरकर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे तीनशे एजंटाच्या माध्यमातून कलेक्शन केले जाते.

 कित्येक छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणून देखील रोज शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पिग्मी भरत होते़ तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे़ ते या पिग्मीच्या माध्यमातून बँकांकडे भरत असतात़ कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रावर संकट ओढावले आहे. सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर  हे संकट दूर व्हावे यासाठी गावोगावी प्रार्थना होऊ लागली आहे.

दैनंदिन रोजीरोटीवर परिणाम- सध्या जनता कर्फ्यूपासून हॉस्पिटल, मेडिकल, किराणा व भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद आहेत़ त्यामुळे या हातावरचे पोट असणाºया म्हणजे कलेक्शन केले तरच चार पैसे मिळणारा व एजंट वर्ग अडचणीत आला आहे़ कित्येक एजंटाचे एका दिवसाचे कलेक्शन पाच हजारांपासून वीस ते पन्नास हजारांपर्यंत आहे़ त्यांना काही संस्था दीड टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत कमिशन देतात़ हे कलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली आहे़ त्यामुळे संस्थांचा एनपीए ही वाढण्याचा धोका आहे़ 

सर्व पतसंस्था, बँका, मल्टीस्टेट, फायनान्स यांचे मिळून शहर व तालुक्यात दररोज सव्वा कोटी रुपयापेक्षा जास्त संकलन होत होते; मात्र गेल्या पस्तीस दिवसांपासून बंद असल्यामुळे तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली आहे़ यामुळे संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़ - मिलिंद कांबळे, सरव्यवस्थापक, भगवंत मल्टीस्टेट बार्शी.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस