शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव प्रकल्प पावसाळ्यात कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:32 IST

बार्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली

ठळक मुद्देवैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली

धनाजी शिंदे वैराग : बार्शी तालुक्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पडणारा पाऊस यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई अर्थात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात याही वर्षी तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हिंगणी, ढाळेपिंपळगाव व जवळगाव यांसारखे प्रकल्प आणि भोगावती, नागझरी, नीलकंठा या नद्या पावसाअभावी कोरड्याठाक पडल्या आहेत तर धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली आहे. धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली़ तशीच वेळ आज हिंगणी, पिंपरी, पिंपळगाव, मळेगाव येथील द्राक्षे पिकवणाºया शेतकºयांवर आली आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा पाण्याअभावी नेस्तनाबूत होणार हे पाहून शेतकरीराजा चिंतातुर व भावुक झाला आहे. वर्षभराचे नियोजन ज्या पिकावर शेतकरी करतो त्या खरिपाची पेरणी परिस्थिती नसतानाही केली आहे.

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती आज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पावसाने दिलेली हुलकावणी व याही वर्षी दिलेली ओढ यामुळे मुलांच्या शिक्षणाचा आणि जीवन जगण्याचा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील वातावरण नसल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी