शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव प्रकल्प पावसाळ्यात कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:32 IST

बार्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली

ठळक मुद्देवैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली

धनाजी शिंदे वैराग : बार्शी तालुक्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पडणारा पाऊस यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई अर्थात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात याही वर्षी तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हिंगणी, ढाळेपिंपळगाव व जवळगाव यांसारखे प्रकल्प आणि भोगावती, नागझरी, नीलकंठा या नद्या पावसाअभावी कोरड्याठाक पडल्या आहेत तर धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली आहे. धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली़ तशीच वेळ आज हिंगणी, पिंपरी, पिंपळगाव, मळेगाव येथील द्राक्षे पिकवणाºया शेतकºयांवर आली आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा पाण्याअभावी नेस्तनाबूत होणार हे पाहून शेतकरीराजा चिंतातुर व भावुक झाला आहे. वर्षभराचे नियोजन ज्या पिकावर शेतकरी करतो त्या खरिपाची पेरणी परिस्थिती नसतानाही केली आहे.

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती आज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पावसाने दिलेली हुलकावणी व याही वर्षी दिलेली ओढ यामुळे मुलांच्या शिक्षणाचा आणि जीवन जगण्याचा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील वातावरण नसल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी