शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

उच्चशिक्षित सुनीलनेघरपोच द्राक्ष विक्रीतून मिळविले सहा लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 09:05 IST

लॉकडाऊनवर मात; देवळालीच्या सुनील ढेरे या शेतकºयाची अशीही जिद्द

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या कालावधीत आपला माल कसा विक्री करायचा असा मोठा प्रश्नलॉकडाऊनमध्ये शहरातील सोशल मीडियावरून घरपोच द्राक्ष विक्रीची जाहिरातद्राक्ष बागायतदारांनी लॉकडाऊन सुरू झाल्याने बेदाणा केला तर काहींनी बाग तोडून टाकली

नासीर कबीर

करमाळा : जिद्द नाही तो शेतकरी कसला... कैक संकटांवर मात करणाºया शेतकºयानं लॉकडाऊन काळातही आपला चिवटपणा सोडला नाही. त्याच्या चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावरच करमाळा तालुक्यातील देवळालीच्या सुनील उत्तम ढेरे या तरुण शेतकºयानं लॉकडाऊन काळात निराश न होता २१ दिवसात १५ टन द्राक्ष घरोघरी फिरून विक्री करत तब्बल ६ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यासाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी करत लॉकडाऊनवर मात केली आहे.

देवळाली (ता.करमाळा) येथील सुनील उत्तम ढेरे हा एम.ए.बी.एड. शिक्षित असून,  शिक्षकाच्या नोकरीसाठी लाखो रुपये मागणी झाली पण सुनीलची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो पैसे देऊ शकला नाही. त्यांनी हार मानली नाही. वडील उत्तम ढेरे,पत्नी सविता, भाऊ रमेश व भावजय शोभा यांना बरोबर घेऊन  २००६ मध्ये साडेतीन एकरात द्राक्ष बाग केली. पहिल्या टप्प्यात एक एकरात ७ लाख रुपये उत्पन्न मिळाले दुसºया टप्प्यात ८ लाख रुपये उत्पन्न मिळाले. 

ऐन द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू झालेला असताना कोरोना विषाणूचा फैलाव देशात व राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने राज्यातील बाजार बंद झाले. तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी लॉकडाऊन सुरू झाल्याने बेदाणा केला तर काहींनी बाग तोडून टाकली. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुनीलने निराश न होता आपली द्राक्ष आपल्या गावातच स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करून विकायची असे ठरवले. मग लॉकडाऊनमध्ये शहरातील सोशल मीडियावरून घरपोच द्राक्ष विक्रीची जाहिरात केली.

पोलीस-प्रशासनाचे प्रोत्साहन अन् पाठबळ..- लॉकडाऊनच्या कालावधीत आपला माल कसा विक्री करायचा असा मोठा प्रश्न होता. आपण येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची ठाण्यात जाऊन समक्ष भेट घेतली.  सर्व परिस्थिती सांगितली. मग सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क आदीचा वापर करून वाहनावर परवाना लावून द्राक्ष विक्री करण्यास परवानगी दिली व त्यामुळेच हे सर्व शक्य झाले असे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील ढेरे यांनी सांगितले.

२१ दिवसात १५ टन माल हातोहात विकला- सुनीलने जुन्या मारुती कारमध्ये एका वेळेस २० कॅरेट माल फिरून तीन फेºयाद्वारे  करमाळा शहर व परिसरात गल्ली-बोळातून, घरोघरी जाऊन प्रतिकिलो ५० रुपयांप्रमाणे ५ किलो पॅकिंग करून द्राक्ष विक्री केली. शिवाय शहरातील छोटे १४ हातगाडी व फेरीवाले यांच्याशी संपर्क करून त्यांना ४० रुपये किलोने माल दिला व बघता बघता लॉकडाऊनच्या  २१ दिवसात सुनीलने १५ टन माल विक्री केला.त्यातून त्यास ६ लाख रुपये मिळाले. या युवा शेतकºयाने सॅनिटायझर व मास्कचा वापर करत ग्राहकाचा विश्वास संपादन केला.  

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस