शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अर्ध्यावर शिक्षण सोडणार होतो पण शिक्षकांनी माझी बाजू मांडली : संतोष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:36 IST

गुरूपोर्णिमा विशेष; सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार याच्याशी संवाद

ठळक मुद्देशाळेपासूनच मी अभ्यासात चांगला होतो. नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत होतो - संतोष शेलार शालेय शिक्षण झाल्यावर मी सिव्हिल शाखेतून पदविकेच्या शिक्षणासाठी साताºयामधील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला - संतोष शेलार आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र, प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले आणि प्रा. एम. एस गोपाळ यांनी माझे मन तर वळविले - संतोष शेलार

शीतलकुमार कांबळे

सोलापूर:  घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मला शिकता येत नव्हते. शिक्षणासाठीचा खर्च भागविण्याची माझी ऐपत नव्हती म्हणून डिप्लोमाचे (तंत्रनिकेतन) शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, माझ्या शिक्षकांनी संस्थेमध्ये माझी बाजू मांडली. फक्त महाविद्यालयाचे शुल्क भरु शकत नाही म्हणून एका हुशार विद्यार्थ्याचे नुकसान व्हायला नको, असे म्हणत त्यांनी मला सवलत मिळवून दिली़ त्यामुळेच मी पुढे अभियांत्रिकीची पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करु शकलो, असा आपल्या शिक्षकांबद्दलचा अनुभव सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितला.

शेलार पुढे म्हणाले, शाळेपासूनच मी अभ्यासात चांगला होतो. नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत होतो. शालेय शिक्षण झाल्यावर मी सिव्हिल शाखेतून पदविकेच्या शिक्षणासाठी साताºयामधील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.

आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र, प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले आणि प्रा. एम. एस गोपाळ यांनी माझे मन तर वळविलेच शिवाय महाविद्यालयात माझी बाजू मांडली. यामुळे मी शिकू शकलो, असेही ते यावेळी म्हणाले.

सिव्हिलमधील पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी मला पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. यामुळेच मी सिव्हिलमधील पदवी व स्ट्रक्चरमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या शिक्षकांनीच मला एमपीएससीची (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्या सल्ल्यामुळे मी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो.

माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्यांनी प्रोत्साहन दिले नसते तर मी जीवनात यशस्वी झालो नसतो. आताही मी माझ्या गुरुंच्या संपर्कात असतो. एखादी अडचण आली की त्यांच्याशी चर्चा करतो. ते आजही मला मार्गदर्शन करतात. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर खासगी कंपनीत काम करण्याऐवजी एमपीएसीच्या परीक्षेसाठी मी तयार झालो.

शिक्षकांनी आर्थिक मदतही केली महाविद्यालयाच्या परीक्षेत माझी शैैक्षणिक प्रगती चांगली होती. याबद्दल शिक्षकांनाही चांगलेच माहीत होते. महाविद्यालय सोडण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली होती. तशी वेळ आल्यानंतर त्यांनी मला मदत केली. यामुळे मला महाविद्यालय शिक्षण पूर्ण करता आले. इतकेच नव्हे तर त्यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी आयुष्यात काहीतर करुन दाखवू शकलो.

टॅग्स :Solapurसोलापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागGuru Purnimaगुरु पौर्णिमा