शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:23 IST

सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे नोंदविले.दमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रसिध्द अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद ...

ठळक मुद्देदमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार प्रदानसामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचाही या पुरस्काराने गौरव

सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे नोंदविले.

दमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रसिध्द अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचाही या पुरस्काराने गौरव झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे पुरस्कार प्रदान केले. प्रत्येकी ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, वात्रटिकाकार रामदास फुटाणे मंचावर होते.

डॉ. देवी म्हणाले की, खेड्यामध्ये माझा जन्म झाला. त्यावेळी सरकारचे शिक्षणासाठीचे धोरण चांगले होते. खासगीकरण झालेले नव्हते. त्यामुळे सरकारी मदतीवर पीएच. डी. पर्यंत शिक्षण झाले. योगी अरविंदांच्या कवितांवर संशोधन करून पीएच. डी. घेतली. अरविंदांप्रमाणेच गुजरात विद्यापीठात अध्यापन केले. इंग्लंडमध्ये जाऊनही शिकलो; पण मनातील खेडे जात नव्हते. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन गुजरातमधील खेड्यांमध्ये आदिवासींसाठी कार्य केले. आदिवासींच्या खेड्यांमध्ये कोणताही विकास झालेला नव्हता. स्वातंत्र्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे की आहे त्या स्थितीत जगू द्यायचे, याबाबतचा विचार झाला; पण त्यांना नेमके कसे जगायचे आहे, हे आदिवासींना कोणीच विचारले नाही. त्यामुळे त्यांना ज्या पध्दतीने जगायचे आहे तसे त्यांचे जगणे सुकर होण्यासाठी कार्य केले. त्यानंतर महाश्वेतादेवींबरोबर अनेक किलोमीटरचा प्रवास करून भटक्या विमुक्तांसाठी कार्य केले.

देशातील आणि आफ्रिकेतील मातृभाषा आणि बोलीभाषांसंदर्भात केलेल्या कामाबद्दल मनोगत व्यक्त केल्यानंतर डॉ. देवी यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, दाभोळकरांवर काही अंतरावरून गोळ्या झाडल्या. गोविंद पानसरेंना घराच्या दारात मारले. कलबुर्गींचा तर घरात घुसून जीव घेतला. गौरी लंकेशची अशीच घराच्या अंगणात हत्या झाली. यावरून मारेकºयांचे धाडस कसे वाढत आहे, हे लक्षात येते. आता मी कलबुर्गींच्या गावात म्हणजे धारवाडमध्ये जाऊन ‘दक्षिणायन’ ही चळवळ राबवित आहे. अंधाराचा काळ दूर जाऊन नवीन पहाट कशी होईल, यासाठीची ही चळवळ असल्याचे ते म्हणाले.

अनासपुरे यांनी आपला नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील संघर्षाचा काळ सांगून ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. आयुष्यातील भ्रम जेव्हा संपला तेव्हा आपण कशासाठी आहोत, याची जाणीव झाली. यातूनच मी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत देऊ लागलो. एकदा नाना पाटेकरांनी मला पैसे देऊन मदत करायला सांगितली. नानाला प्रसिध्दी नको होती; पण मी नानाला आग्रह धरला. त्यामुळे नाना प्रत्येक उपक्रमासाठी येऊ लागले आणि ‘नाम’ फउंडेशनचे कार्य सुरू झाले, असे ते म्हणाले.शिंदे यांनी आपल्या भाषणात डॉ. देवी आणि अनासपुरे यांच्या कार्याची प्रशंसा केली. या दोघांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगून ते म्हणाले की, या दोघांचीही आपल्या विचार आणि तत्त्वांवर निष्ठा आहे. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला असल्याचे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.प्रारंभी पटेल यांनी प्रास्ताविक केले. फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

मकरंद अनासपुरे यांचे औदार्य- मकरंद अनासपुरे यांनी आपल्या मनोगतानंतर पुरस्काराची रक्कम पारधी समाजाच्या कार्यासाठी देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी दाखविलेल्या या औदार्याला सोलापूरकरांनी टाळ्यांनी दाद दिली. मोहोळ तालुक्यातील पारधी समाजासाठी सुरू केलेल्या भारतमाता प्रतिष्ठानला ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या प्रतिष्ठानचे प्रमुख ज्ञानेश्वर भोसले यांनी तो स्वीकारला.

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMakrand Anaspureमकरंद अनासपुरे