शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:23 IST

सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे नोंदविले.दमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रसिध्द अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद ...

ठळक मुद्देदमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार प्रदानसामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचाही या पुरस्काराने गौरव

सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे नोंदविले.

दमाणी-पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रसिध्द अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांचाही या पुरस्काराने गौरव झाला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे पुरस्कार प्रदान केले. प्रत्येकी ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, वात्रटिकाकार रामदास फुटाणे मंचावर होते.

डॉ. देवी म्हणाले की, खेड्यामध्ये माझा जन्म झाला. त्यावेळी सरकारचे शिक्षणासाठीचे धोरण चांगले होते. खासगीकरण झालेले नव्हते. त्यामुळे सरकारी मदतीवर पीएच. डी. पर्यंत शिक्षण झाले. योगी अरविंदांच्या कवितांवर संशोधन करून पीएच. डी. घेतली. अरविंदांप्रमाणेच गुजरात विद्यापीठात अध्यापन केले. इंग्लंडमध्ये जाऊनही शिकलो; पण मनातील खेडे जात नव्हते. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन गुजरातमधील खेड्यांमध्ये आदिवासींसाठी कार्य केले. आदिवासींच्या खेड्यांमध्ये कोणताही विकास झालेला नव्हता. स्वातंत्र्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे की आहे त्या स्थितीत जगू द्यायचे, याबाबतचा विचार झाला; पण त्यांना नेमके कसे जगायचे आहे, हे आदिवासींना कोणीच विचारले नाही. त्यामुळे त्यांना ज्या पध्दतीने जगायचे आहे तसे त्यांचे जगणे सुकर होण्यासाठी कार्य केले. त्यानंतर महाश्वेतादेवींबरोबर अनेक किलोमीटरचा प्रवास करून भटक्या विमुक्तांसाठी कार्य केले.

देशातील आणि आफ्रिकेतील मातृभाषा आणि बोलीभाषांसंदर्भात केलेल्या कामाबद्दल मनोगत व्यक्त केल्यानंतर डॉ. देवी यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, दाभोळकरांवर काही अंतरावरून गोळ्या झाडल्या. गोविंद पानसरेंना घराच्या दारात मारले. कलबुर्गींचा तर घरात घुसून जीव घेतला. गौरी लंकेशची अशीच घराच्या अंगणात हत्या झाली. यावरून मारेकºयांचे धाडस कसे वाढत आहे, हे लक्षात येते. आता मी कलबुर्गींच्या गावात म्हणजे धारवाडमध्ये जाऊन ‘दक्षिणायन’ ही चळवळ राबवित आहे. अंधाराचा काळ दूर जाऊन नवीन पहाट कशी होईल, यासाठीची ही चळवळ असल्याचे ते म्हणाले.

अनासपुरे यांनी आपला नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील संघर्षाचा काळ सांगून ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. आयुष्यातील भ्रम जेव्हा संपला तेव्हा आपण कशासाठी आहोत, याची जाणीव झाली. यातूनच मी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना काही आर्थिक मदत देऊ लागलो. एकदा नाना पाटेकरांनी मला पैसे देऊन मदत करायला सांगितली. नानाला प्रसिध्दी नको होती; पण मी नानाला आग्रह धरला. त्यामुळे नाना प्रत्येक उपक्रमासाठी येऊ लागले आणि ‘नाम’ फउंडेशनचे कार्य सुरू झाले, असे ते म्हणाले.शिंदे यांनी आपल्या भाषणात डॉ. देवी आणि अनासपुरे यांच्या कार्याची प्रशंसा केली. या दोघांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगून ते म्हणाले की, या दोघांचीही आपल्या विचार आणि तत्त्वांवर निष्ठा आहे. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला असल्याचे गौरवोद्गारही शिंदे यांनी काढले.प्रारंभी पटेल यांनी प्रास्ताविक केले. फुटाणे यांनी आभार मानले. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

मकरंद अनासपुरे यांचे औदार्य- मकरंद अनासपुरे यांनी आपल्या मनोगतानंतर पुरस्काराची रक्कम पारधी समाजाच्या कार्यासाठी देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी दाखविलेल्या या औदार्याला सोलापूरकरांनी टाळ्यांनी दाद दिली. मोहोळ तालुक्यातील पारधी समाजासाठी सुरू केलेल्या भारतमाता प्रतिष्ठानला ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या प्रतिष्ठानचे प्रमुख ज्ञानेश्वर भोसले यांनी तो स्वीकारला.

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMakrand Anaspureमकरंद अनासपुरे