शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कामगार कायद्यात बदल करणारे सरकार पुन्हा सत्तेवर : के.  हेमलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:49 PM

श्रमिकाला १८ हजार किमान वेतन करण्यासाठी सिटूच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय

ठळक मुद्देकामकाजी महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, कंत्राटी कामगार, सरकारची दडपशाही याला सामोरे जाणे अपरिहार्यत्येक श्रमिकाला १८ हजार किमान वेतनाची गरज आहे यासाठी सतत सरकारशी संघर्ष करावा लागत आहे

सोलापूर : देशात पुन्हा प्रतिगामी सरकार सत्तेवर आले आहे. ४४ कामगार कायद्यात बदल करण्याचा भाजप सरकारने डाव रचलेला आहे. हा डाव उधळून पाडून श्रमिकांसाठी १८ हजार रुपये किमान वेतन करण्यासाठी सिटूच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार असल्याचे संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. हेमलता यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे सिटू सुवर्ण महोत्सवी वर्षारंभाचे औचित्य साधून संघर्षशील कामगारांच्या कार्याचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना संवाद साधला. यावेळी कामगार नेते नरसय्या आडम उपस्थित होते.

हेमलता पुढे म्हणाल्या की, कामगार संघटना संघर्षाची १०० वर्षे व सिटूची ५० वर्षे ही संघर्ष यात्रा जनतेच्या एकजुटीने, मजबुतीने पुढे अखंडितपणे नेण्याचा निर्धार सिटूने केलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध प्रकारच्या उद्योग धंद्यांत काम करणाºया कष्टकरी कामगारांचे प्रश्न घेऊन लांब पल्ल्याची लढाई करून कामगारांच्या भक्कम सहभागातून न्याय मिळवून देण्यात सिटू अग्रेसर राहिलेले आहे.

आज देशात सत्तेत आलेलं सरकार प्रतिगामी सरकार आहे. मागच्या पाच वर्षांत ४४ कामगार कायद्यात प्रतिगामी बदल करण्याचा डाव रचलेला आहे. हा डाव हाणून पाडला पाहिजे. ही कामगारांची पहिली जबाबदारी आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक श्रमिकाला १८ हजार किमान वेतनाची गरज आहे यासाठी सतत सरकारशी संघर्ष करावा लागत आहे. याचबरोबर कामकाजी महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, कंत्राटी कामगार, सरकारची दडपशाही याला सामोरे जाणे अपरिहार्य आहे.

सर्वसामान्य जनतेला सकस आहार, उत्तम आरोग्य, उच्चदर्जाचे शिक्षण मिळवण्यासाठी किमान वेतन देणे सरकारची जबाबदारी असताना उलटपक्षी सरकार खासगी शाळा, महाविद्यालय, खासगी रुग्णालय अनुदानाची खीर, सवलती देत आहेत सरकार शाळा, रुग्णालयासाठी तिजोरी रिकामी आहे असे सांगत चालढकल करत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, असेही हेमलता म्हणाल्या. यावेळी सिटूचे सर्व पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी