शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Good News; उजनी धरण १०० टक्के भरले; पुणे जिल्ह्यातील पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 06:57 IST

Lokmat news Network

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मंगळवार ५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास १०० टक्के भरले असून धरणात ११७ टीएमसी पाणी साठा झालेला आहे. १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत धरणात १११.५९ टक्के पाणी पातळी व १२३.२८ टीएमसी पाणी साठा होणे नियोजित आहे. 

२०२१ च्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील चार महिन्यात एकदाही एक लाख- दोन लाख क्यूसेक्स विसर्गाने पाणी आलेले नाही, परंतु दौंड येथून ३२०० क्युसेक्स ते २५-३० हजार  क्यूसेक्स पर्यंत विसर्गाने पाणी आलेले आहे व अशा लहान विसर्गावरच उजनी धरणाने आज १०० टक्केची पातळी गाठली आहे. धरणाच्या मागील ४२ वर्षांच्या इतिहासातील १०० टक्के भरण्याची ही ३७ वी वेळ आहे. 

उजनी धरणाच्या वरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी आदी लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के भरून 'ओव्हरफ्लो' झालेली आहेत, तसेच यातील ६ ते ७ धरणांमधून जास्त झालेले एकुण सहा ते सात हजार क्युसेक्स पाणी खाली प्रवाहात सोडून देण्यात येत आहे, त्यामुळे सध्या बंडगार्डन येथील विसर्ग ५७१० क्युसेक आहे तर दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ होत आहे व सध्या तो ७६६३ क्युसेक इतका आहे आणि यामध्ये प्रत्येक तासाला वाढ होत आहे. ४ ऑक्टोबरपासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात  चांगली पर्जन्यवृष्टी चालू आहे व यामुळे सर्व नद्यांना पूर आलेले आहेत. हे पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसUjine Damउजनी धरणPuneपुणे