शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ऊसशेतीला फाटा देत तीन एकरावरील द्राक्ष उत्पादनात मिळविले १६ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:37 AM

करकंब येथील शरद पांढरे या शेतकºयाची यशोगाथा; पाच टन केला बेदाणा

ठळक मुद्देपांढरे यांनी द्राक्ष पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात छाटणी केलीरोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली शिवाय उत्पादनातही घटतीन एकरांतून किमान ४० टन द्राक्ष अपेक्षित होते

शहाजी काळे करकंब : पारंपरिक ऊसशेतीला फाटा देऊन तीन एकर द्राक्ष शेतीतून तब्बल १६ लाखांचे उत्पादन घेण्याची किमया करकंब (ता़ पंढरपूर) येथील एका शेतकºयाने साधली आहे़ नवनवीन प्रयोग, वेगवेगळ्या फवारण्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने १९ टन द्राक्षे तर ५ टन बेदाणा केला.

 अ‍ॅड. शरद पांढरे असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ पांढरे यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. वकिली व्यवसायाला बगल देत शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांची शेती उजनी डाव्या कालव्यालगत आहे़ सुरुवातीपासूनच त्यांचा उसाकडे कल होता़ त्यांना प्रयोगशील शेतीची आवड असल्याने विविध ठिकाणी     भेटी देऊन वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास केला़ नानासाहेब पर्पल या वाणाच्या द्राक्षाची तीन एकर क्षेत्रात लागवड केली. नानासाहेब हे वाण जोखमीचे असून, या जातीला जास्तीच्या कीटकनाशक फवारणी व जास्तीचा उत्पादन खर्च करावा लागतो. परंतु उच्चशिक्षित व व्यवसायाने वकील असलेल्या पांढरे यांना शेतीमध्ये नवनवीन पिकांचा अभ्यास करून प्रयोगशील शेती करण्याचा छंद जडलेला.

त्यांनी नानासाहेब वाणाची जोखीम स्वीकारली. आॅक्टोबर महिन्यात द्राक्षाची पीक छाटणी केली. त्यानंतर सलग ५५ दिवस कमी-अधिक प्रमाणाचा पाऊस लागल्यामुळे नानासाहेब वाणाची जोखीम वाढली़ बागेवर दावण्या व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला़ त्यामुळे त्यांना अतिरिक्त एक लाख रुपयांच्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. त्यांना द्राक्षातून किमान ४० टन उत्पादन अपेक्षित होते. परंतु छाटणीनंतर सुरुवातीच्या काळात असलेल्या खराब हवामानामुळे द्राक्षाचा दर्जा घसरला तरी पांढरे   यांची असलेली महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि चिकाटी यामुळे २४ टन   उत्पादन घेण्यात यश मिळाले़  त्यापैकी त्यांनी १९ टनाचे मार्केटिंग केले़ उर्वरित ५ टन बेदाणा केला. तीन एकरांत उत्पादन घेण्यासाठी त्यांना पाच लाखांचा खर्च आला़ एकूण उत्पादनातून ५ लाख उत्पादन खर्च वजा जाता ११ लाख ५० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

सततच्या पावसाने १२ लाखांचे नुकसान- पांढरे यांनी द्राक्ष पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात छाटणी केली. परंतु आॅक्टोबर महिन्यात ५५ दिवस सतत पाऊस असल्यामुळे बागेवर दावण्यासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि संकट ओढावले. यावर मात करण्यासाठी पांढरे यांनी महागडी कीटकनाशक औषधे फवारणी करुन बाग जोपसण्याचा प्रयत्न केला. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली शिवाय उत्पादनातही घट झाली़ तीन एकरांतून किमान ४० टन द्राक्ष अपेक्षित होते. परंतु त्यामध्ये घट झाली आणि २४ टनावर समाधान मानावे लागले़ 

नानासाहेब हे वाण जोखमीचे असताना लागवडीपूर्वीच त्याचा अभ्यास केला होता. अनेक ठिकाणच्या अभ्यासदौºयात त्याचे फायदे-तोटे आणि लागवडीचे तंत्र अवगत केले होते. परिणामत: तीन एकरात्ां १६ लाखांचे द्राक्ष आणि बेदाणा घेता आला आणि याचे मार्केटिंगदेखील स्वत:च केले़यातून काही चांगले शिकताही आले़ - अ‍ॅड. शरद पांढरे, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात