शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

कमी गुण मिळालेत.. घाबरू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:39 IST

विद्यार्थी मित्रांनो गुण कमी मिळालेत घाबरू नका... गुणांवरून गुणवत्ता ठरविण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती ...

विद्यार्थी मित्रांनो गुण कमी मिळालेत घाबरू नका... गुणांवरून गुणवत्ता ठरविण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते तर गुणवत्ता यादीत आले असते का? न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? शून्यातून विश्व निर्माण करणाºया या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा आम्हांस माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रिकातील गुणांचाच आग्रह का, कशासाठी आपण धरत आहोत. यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल, तर मग समाजातील बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नव्हते, ते जगायला अपात्र ठरली आहेत का... तर नाही.

आजचे युग हे जीवघेण्या स्पर्धेचे आहे. अगदी जन्माला आल्यापासून ही स्पर्धा चालू होते, हा ताण कधी कधी शालेय विद्यार्थ्यांना एवढा असह्य होतो की, या त्रासापासून मुक्त होण्यासाठी ते आपले जीवन संपवून टाकतात. याची सुरुवात अगदी आपल्या घरापासून होते. कारण प्रत्येक पालकाला आपला पाल्य सर्वात पुढे राहिला पाहिजे, असे वाटत असते. समाजात वावरत असताना मुलांच्या गुणांची चिंता कोणाला अधिक आहे हे समजेल. एखादा शेतकरी, मजूर आई-वडिलांनी असा आग्रह धरलेला मला तर कधीच दिसला नाही. पण बहुदा शिकून स्थिर झालेले सुशिक्षित म्हणून घेणारे पालक गुणांसाठी आग्रही असतात.

दहावी, बारावी परीक्षेत जर गुण किंवा ग्रेड कमी आले तर विद्यार्थी हताश होतात. सर्व काही संपले, या आविर्भावात राहतात. वर्षभर मेहनत करूनही आपल्याला कमी गुण का पडले, याचाच विचार ही मंडळी करतात. अपेक्षेपेक्षा मार्क कमी पडल्याने भविष्यकाळ अंधार वाटू लागतो. आपले काही खरे नाही, असा विचार मनामध्ये बळावतो. आज आमची सगळी व्यवस्था निकालाभोवती फिरताना दिसते. पण खरे गुणवान व गुणवत्ताधारक या व्यवस्थेतही टिकून राहतात.  गुण महत्त्वाचेच, पण गुणवत्ता त्याहूनही अधिक मोलाची आहे. गुणवत्तेशिवाय गुणांचे खरे मोल कळत नाही.

गुण कमी पडले तर हताश किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी अशा बॅडपॅचला सामोरे जावे लागते. त्यामुळे काळजी करू नका, चुकांमधून पुन्हा शिकण्याचा प्रयत्न करा. गुण कोणत्या कारणामुळे कमी पडले याचे अवलोकन करा. आपल्याला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणखी काय करावे लागेल, यासाठी पालक, मित्र आणि शिक्षकांशी सल्लामसलत, चर्चा करा. त्यांच्यापासून दूर राहण्याते नुकसान आपलेच असते. नेहमी सकारात्मक विचार करा. स्पर्धात्मक युगात गुणांना नक्कीच महत्त्व आहे, परंतु त्यापेक्षाही आपले जीवन मौल्यवान आहे. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी मुलांकडून घडतीलही. अपयश पदरी येईल, पण अपयश हा काही प्रयासांचा शेवट नाही. फारफारतर अपयश हा यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, तो रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. प्रत्येकाकडे त्याच्या क्षमता असतात. त्याला त्या शोधू द्या. 

निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे फुलवतात. कोणी उंच उडी, कोणी लांब उडी मारून उच्चांक करतो. यश मिळवू शकतो. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की, यशाचे मार्ग निर्माण करता येतात... त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गुण कमी मिळाले म्हणून घाबरून जाऊ नका. त्यातूनही तुमचे काही चांगले होणार असेलच.....- प्रा. तात्यासाहेब काटकर (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरHSC Exam Resultबारावी निकाल