शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज थकविणाऱ्यांना चौदाशे कोटी दिले; प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना लटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे दीड लाखापर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले, तर दीड लाखावरील कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना राबवली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ९५२‍ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला होता.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, असे म्हणत सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९मध्ये जाहीर केली. या सरकारने दोन लाखांपर्यंतच्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ६४८ कोटी ९८ कोटी रुपये बँकांना दिले आहेत. भाजपा व आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी जिल्ह्याला एकूण १,४७५ कोटी ५२ लाख रुपये दिले आहेत.

यामध्ये भाजपा सरकारच्या कालावधीतील दीड लाखांपर्यंतच्या संपूर्ण कर्ज माफीचे ५११ कोटी ६१ लाख, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे १०६ कोटी ७० लाख तसेच ओटीएसचे २०८ कोटी २३ लाख रुपयांचा समावेश आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याची घोषणा आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी मुर्हूत लागला नाही.

-----

जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभधारक

भाजपा व आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील दोन लाख १३ हजार ८२९ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. यामध्ये केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक लाख ३८ हजार ५१६ खातेदारांना तब्बल ८४९ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत. इतर सर्व बँकांच्या ७५ हजार ३१३ शेतकऱ्यांना ६२६ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.

----

दीड लाखापर्यंतच्या ७३ हजार ४९८ शेतकऱ्यांना ५११ कोटी ६१ लाख, नियमित कर्ज भरणाऱ्या ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना १०६ कोटी ७० लाख, १९ हजार ५९ शेतकऱ्यांना २०८ कोटी २३ लाख असे ८२६ कोटी ५४ लाख, तर आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ६४९ कोटी रुपये दिले आहेत.

---