शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कर्ज थकविणाऱ्यांना चौदाशे कोटी दिले; प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना लटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे दीड लाखापर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले, तर दीड लाखावरील कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना राबवली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ९५२‍ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला होता.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, असे म्हणत सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९मध्ये जाहीर केली. या सरकारने दोन लाखांपर्यंतच्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ६४८ कोटी ९८ कोटी रुपये बँकांना दिले आहेत. भाजपा व आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी जिल्ह्याला एकूण १,४७५ कोटी ५२ लाख रुपये दिले आहेत.

यामध्ये भाजपा सरकारच्या कालावधीतील दीड लाखांपर्यंतच्या संपूर्ण कर्ज माफीचे ५११ कोटी ६१ लाख, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे १०६ कोटी ७० लाख तसेच ओटीएसचे २०८ कोटी २३ लाख रुपयांचा समावेश आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याची घोषणा आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी मुर्हूत लागला नाही.

-----

जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभधारक

भाजपा व आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील दोन लाख १३ हजार ८२९ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. यामध्ये केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक लाख ३८ हजार ५१६ खातेदारांना तब्बल ८४९ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत. इतर सर्व बँकांच्या ७५ हजार ३१३ शेतकऱ्यांना ६२६ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.

----

दीड लाखापर्यंतच्या ७३ हजार ४९८ शेतकऱ्यांना ५११ कोटी ६१ लाख, नियमित कर्ज भरणाऱ्या ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना १०६ कोटी ७० लाख, १९ हजार ५९ शेतकऱ्यांना २०८ कोटी २३ लाख असे ८२६ कोटी ५४ लाख, तर आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ६४९ कोटी रुपये दिले आहेत.

---