शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म, श्राद्धविधी लांबणीवर टाकण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 11:48 IST

पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती; धर्मशास्त्र संमत, कोरोना लॉकडाउंनमुळे केले मार्गदर्शन

ठळक मुद्देएखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागतेदहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहेवातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म

सोलापूर : स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध हे विधी केले जातात. यासाठी अनेक लोक एकत्र येतात. तसेच या विधीसाठी गुरुजींची देखील गरज असते. मात्र, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून असे लोक एकत्र येणे टाळणे गरजेचे आहे. म्हणून हे संकट निवळल्यानंतरही अंत्यकर्म व श्राद्ध करता येते, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने लॉकडाउनचा आदेश लागू केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या काळात घाटावरील विधी करावयाचे असल्यास लोक एकत्र येतात; पण या स्थितीत हा आजार जास्त पसरू शकतो, याचा विधी पुढे ढकलणे शक्य आहे, असे पंचांगकर्ते दाते म्हणाले. या काळात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर धार्मिक विधी करताना अडचणी येतात. यामुळे दाते यांनी हे मार्गदर्शन केले आहे. 

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागते. मात्र, अंत्यकर्म नंतरही करता येऊ शकते. दहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहे. घाटावरील विधी करताना लोक व गुरुजी न येणे या अडचणी होऊ शकतात. हे विधी संकट निवळल्यावरही करता येतात. वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्त्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तर सर्व अस्थी विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधी करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत. त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे, घरातील दिवा अकराव्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक अकराव्या दिवशी संपते. त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यामुळे करता येईल, असे पंचांगकर्ते  दाते यांनी सांगितले.

प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर, वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावस्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दर वर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्त्र संमत आहे.- मोहन दाते, पंचांगकर्ते

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस