शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:25 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत कामे : चार वर्षात लावली ४ लाख ५० हजार ४८५ रोपं...

ठळक मुद्देनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावलीसिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत

सोलापूर : कोरोना काळात नैसर्गिक आणि कृत्रिम ऑक्सिजनची चर्चा घराघरात होतेय़ याचे महत्त्वही प्रत्येकाला कळून आले आहे. सोलापुरात नैसर्गिक ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न झाले आहेत. २०१६ ते २०२० या चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत विविध उपक्रमांतर्गत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात ४ लाख ५०,४८५ रोपं लावली़ त्यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात ३ लाख ९,२४५ रोपं जगली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़) चे इर्शाद शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली आहे़ हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभाग हे दोन्ही विभाग विविध माध्यमातून धडपड करीत आहेत़ याही काळात रोपांच्या लागवडीवर भर दिला आहे.

मागील चार वर्षांत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यात ऑक्सिजन वाढवणारी लिंब, सुबाभूळ, अंजन, खैरसह आवळा, सीताफळ आणि आंबा अशी फळ रोपं लावली आहेत. ही रोपं लावत असताना त्याचे नियोजनही केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात गंगाधर कणबस, आचेगाव, हत्तूर, घोडातांडा, माळकवठे, हत्तरसंग, बोरामणी, सलगर, औज मंद्रुप, भंडारकवठे या गावांमध्ये तर उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी, कौठाळी आणि सिद्धेश्वर वनविहारात रोपं लावली आहेत़ याशिवाय अक्कलकोट तालुक्यात दहिटणे, मैंदर्गी, कल्लप्पावाडी, सलगर, चुंगी, सातनदुधनी, मिरजगी, गळोरगी या गावांमध्ये वनविभागाच्या वतीने विविध रोपं लावण्यात आली आहेत़ 

वनविहारात लावली आंब्याची रोपंनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावली़ या शिवाय सिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत़ 

सोलापुरात वृक्षलागवड वाढवून वनाधित क्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न आहे़ वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर रोपं लावली आहेत़ चार वर्षांत ४ लाख ५०, ४८५ रोपं लावली़ ती जगवण्यासाठी वनखात्याचा प्रयत्न झाला़ आता राहिलेल्या रोपांना पाण्याची कमतरता जाणवणार नाही यासाठी नियोजन करतोय़ - इर्शाद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़), सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणSmart Cityस्मार्ट सिटी