शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:25 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत कामे : चार वर्षात लावली ४ लाख ५० हजार ४८५ रोपं...

ठळक मुद्देनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावलीसिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत

सोलापूर : कोरोना काळात नैसर्गिक आणि कृत्रिम ऑक्सिजनची चर्चा घराघरात होतेय़ याचे महत्त्वही प्रत्येकाला कळून आले आहे. सोलापुरात नैसर्गिक ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न झाले आहेत. २०१६ ते २०२० या चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत विविध उपक्रमांतर्गत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात ४ लाख ५०,४८५ रोपं लावली़ त्यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात ३ लाख ९,२४५ रोपं जगली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़) चे इर्शाद शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली आहे़ हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभाग हे दोन्ही विभाग विविध माध्यमातून धडपड करीत आहेत़ याही काळात रोपांच्या लागवडीवर भर दिला आहे.

मागील चार वर्षांत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यात ऑक्सिजन वाढवणारी लिंब, सुबाभूळ, अंजन, खैरसह आवळा, सीताफळ आणि आंबा अशी फळ रोपं लावली आहेत. ही रोपं लावत असताना त्याचे नियोजनही केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात गंगाधर कणबस, आचेगाव, हत्तूर, घोडातांडा, माळकवठे, हत्तरसंग, बोरामणी, सलगर, औज मंद्रुप, भंडारकवठे या गावांमध्ये तर उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी, कौठाळी आणि सिद्धेश्वर वनविहारात रोपं लावली आहेत़ याशिवाय अक्कलकोट तालुक्यात दहिटणे, मैंदर्गी, कल्लप्पावाडी, सलगर, चुंगी, सातनदुधनी, मिरजगी, गळोरगी या गावांमध्ये वनविभागाच्या वतीने विविध रोपं लावण्यात आली आहेत़ 

वनविहारात लावली आंब्याची रोपंनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावली़ या शिवाय सिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत़ 

सोलापुरात वृक्षलागवड वाढवून वनाधित क्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न आहे़ वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर रोपं लावली आहेत़ चार वर्षांत ४ लाख ५०, ४८५ रोपं लावली़ ती जगवण्यासाठी वनखात्याचा प्रयत्न झाला़ आता राहिलेल्या रोपांना पाण्याची कमतरता जाणवणार नाही यासाठी नियोजन करतोय़ - इर्शाद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़), सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणSmart Cityस्मार्ट सिटी