शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

महापुराची धास्ती; पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला ...

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तब्बल ५० तास महापुराच्या पाण्याने या गावातील शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस जागून काढला होता. गावाच्या बाहेर बघावे तिकडे पाणीच पाणी पसरलेले होते. रात्री कोणत्याही प्रसंगी पाण्याची पातळी वाढू शकते, या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. त्या महापुराची धास्ती त्यांच्या मनात आजही असल्याचे दिसून आले.

मागील वर्षी भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. तिने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुडलसंगम येथे पाणी पातळी कमालीची वाढली आणि सीना नदीतील पाण्याचा भीमा नदीत प्रवाह थांबला. पाणी पुढे जाण्याऐवजी वडकबाळ पुलापासून आजूबाजूला पसरत राहिले. पन्नास हजार एकरांपेक्षा अधिक पिके पाण्याखाली गेली होती. किमान दीड लाख टन ऊस महापुरानंतर पाण्यासोबत वाहून गेला. आजही सीना नदी काठोकाठ भरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे.

--------

जनावरे सुरक्षित ठिकाणी

गतवर्षी आलेल्या महापुरात शेकडो जनावरे वाहून गेली. अचानक पूर आल्याने जनावरे शेतात आणि शेतकरी गावात अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना चारा पाणी करता आला नाही. सलग तीन दिवस जनावरे दावणीला बांधून राहिली. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यावर भर दिला आहे. काही ठिकाणी भर रस्त्यावर जनावरे बांधल्याचे चित्र दिसून आले.

-------

बिरनाळ ग्रामस्थांना प्रवाह बदलण्याची भीती

सीना नदीने १९७९ साली आलेल्या महापुरात प्रवाह बदलला होता. बिरनाळ गावापासून वाहणारी ही नदी त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेताची बांधे तोडून राजूरच्या दिशेने वाहिली. या महापुरानंतर नदीचे पात्र बदलले होते. मात्र गतवर्षी जुन्या नदीपात्रात पाणी आल्याने संपूर्ण सीना - भीमा परिसरातील पिके जलमय झाली. आता पातळी वाढली तर पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची भीती बिरनाळ ग्रामस्थांना वाटते.

---------

शेतातील वस्त्या होत आहेत रिकाम्या

बागायत क्षेत्र वाढले आहे त्यामुळे बहुतेक शेतकरी शेतातील वस्तीवर पक्की घरे बांधून राहण्यास गेले आहेत . नदीकाठच्या गावांतील ४० टक्के घरे रिकामी दिसतात. आता महापुराच्या पाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आहे. संसारोपयोगी साहित्यासह शेतातील वस्त्या रिकाम्या करून शेतकऱ्यांनी तूर्तास गावातच राहण्याची तयारी सुरू केली आहे.

---------

मागील वर्षीचा अनुभव खूप भयावह आहे. आम्ही रात्रीची झोप सोडली होती. गाव उंचावर असले तरी घराच्या धाब्यावर उभे राहून आमची पाण्यात बुडालेली शेती पाहताना अश्रूंचा बांधही फुटला होता.

-निसार हमीद अत्तार, शेतकरी, बिरनाळ

(फोटो आहेत)