शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महापुराची धास्ती; पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला ...

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तब्बल ५० तास महापुराच्या पाण्याने या गावातील शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस जागून काढला होता. गावाच्या बाहेर बघावे तिकडे पाणीच पाणी पसरलेले होते. रात्री कोणत्याही प्रसंगी पाण्याची पातळी वाढू शकते, या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. त्या महापुराची धास्ती त्यांच्या मनात आजही असल्याचे दिसून आले.

मागील वर्षी भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. तिने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुडलसंगम येथे पाणी पातळी कमालीची वाढली आणि सीना नदीतील पाण्याचा भीमा नदीत प्रवाह थांबला. पाणी पुढे जाण्याऐवजी वडकबाळ पुलापासून आजूबाजूला पसरत राहिले. पन्नास हजार एकरांपेक्षा अधिक पिके पाण्याखाली गेली होती. किमान दीड लाख टन ऊस महापुरानंतर पाण्यासोबत वाहून गेला. आजही सीना नदी काठोकाठ भरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे.

--------

जनावरे सुरक्षित ठिकाणी

गतवर्षी आलेल्या महापुरात शेकडो जनावरे वाहून गेली. अचानक पूर आल्याने जनावरे शेतात आणि शेतकरी गावात अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना चारा पाणी करता आला नाही. सलग तीन दिवस जनावरे दावणीला बांधून राहिली. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यावर भर दिला आहे. काही ठिकाणी भर रस्त्यावर जनावरे बांधल्याचे चित्र दिसून आले.

-------

बिरनाळ ग्रामस्थांना प्रवाह बदलण्याची भीती

सीना नदीने १९७९ साली आलेल्या महापुरात प्रवाह बदलला होता. बिरनाळ गावापासून वाहणारी ही नदी त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेताची बांधे तोडून राजूरच्या दिशेने वाहिली. या महापुरानंतर नदीचे पात्र बदलले होते. मात्र गतवर्षी जुन्या नदीपात्रात पाणी आल्याने संपूर्ण सीना - भीमा परिसरातील पिके जलमय झाली. आता पातळी वाढली तर पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची भीती बिरनाळ ग्रामस्थांना वाटते.

---------

शेतातील वस्त्या होत आहेत रिकाम्या

बागायत क्षेत्र वाढले आहे त्यामुळे बहुतेक शेतकरी शेतातील वस्तीवर पक्की घरे बांधून राहण्यास गेले आहेत . नदीकाठच्या गावांतील ४० टक्के घरे रिकामी दिसतात. आता महापुराच्या पाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आहे. संसारोपयोगी साहित्यासह शेतातील वस्त्या रिकाम्या करून शेतकऱ्यांनी तूर्तास गावातच राहण्याची तयारी सुरू केली आहे.

---------

मागील वर्षीचा अनुभव खूप भयावह आहे. आम्ही रात्रीची झोप सोडली होती. गाव उंचावर असले तरी घराच्या धाब्यावर उभे राहून आमची पाण्यात बुडालेली शेती पाहताना अश्रूंचा बांधही फुटला होता.

-निसार हमीद अत्तार, शेतकरी, बिरनाळ

(फोटो आहेत)