शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महापुराची धास्ती; पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला ...

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तब्बल ५० तास महापुराच्या पाण्याने या गावातील शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस जागून काढला होता. गावाच्या बाहेर बघावे तिकडे पाणीच पाणी पसरलेले होते. रात्री कोणत्याही प्रसंगी पाण्याची पातळी वाढू शकते, या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. त्या महापुराची धास्ती त्यांच्या मनात आजही असल्याचे दिसून आले.

मागील वर्षी भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. तिने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुडलसंगम येथे पाणी पातळी कमालीची वाढली आणि सीना नदीतील पाण्याचा भीमा नदीत प्रवाह थांबला. पाणी पुढे जाण्याऐवजी वडकबाळ पुलापासून आजूबाजूला पसरत राहिले. पन्नास हजार एकरांपेक्षा अधिक पिके पाण्याखाली गेली होती. किमान दीड लाख टन ऊस महापुरानंतर पाण्यासोबत वाहून गेला. आजही सीना नदी काठोकाठ भरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे.

--------

जनावरे सुरक्षित ठिकाणी

गतवर्षी आलेल्या महापुरात शेकडो जनावरे वाहून गेली. अचानक पूर आल्याने जनावरे शेतात आणि शेतकरी गावात अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना चारा पाणी करता आला नाही. सलग तीन दिवस जनावरे दावणीला बांधून राहिली. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यावर भर दिला आहे. काही ठिकाणी भर रस्त्यावर जनावरे बांधल्याचे चित्र दिसून आले.

-------

बिरनाळ ग्रामस्थांना प्रवाह बदलण्याची भीती

सीना नदीने १९७९ साली आलेल्या महापुरात प्रवाह बदलला होता. बिरनाळ गावापासून वाहणारी ही नदी त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेताची बांधे तोडून राजूरच्या दिशेने वाहिली. या महापुरानंतर नदीचे पात्र बदलले होते. मात्र गतवर्षी जुन्या नदीपात्रात पाणी आल्याने संपूर्ण सीना - भीमा परिसरातील पिके जलमय झाली. आता पातळी वाढली तर पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची भीती बिरनाळ ग्रामस्थांना वाटते.

---------

शेतातील वस्त्या होत आहेत रिकाम्या

बागायत क्षेत्र वाढले आहे त्यामुळे बहुतेक शेतकरी शेतातील वस्तीवर पक्की घरे बांधून राहण्यास गेले आहेत . नदीकाठच्या गावांतील ४० टक्के घरे रिकामी दिसतात. आता महापुराच्या पाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आहे. संसारोपयोगी साहित्यासह शेतातील वस्त्या रिकाम्या करून शेतकऱ्यांनी तूर्तास गावातच राहण्याची तयारी सुरू केली आहे.

---------

मागील वर्षीचा अनुभव खूप भयावह आहे. आम्ही रात्रीची झोप सोडली होती. गाव उंचावर असले तरी घराच्या धाब्यावर उभे राहून आमची पाण्यात बुडालेली शेती पाहताना अश्रूंचा बांधही फुटला होता.

-निसार हमीद अत्तार, शेतकरी, बिरनाळ

(फोटो आहेत)