शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

महापुराची धास्ती; पाण्याचा प्रवाह वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला ...

गतवर्षी सीना नदीला महापूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, बिरनाळ, संजवाड, राजूर या नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला होता. तब्बल ५० तास महापुराच्या पाण्याने या गावातील शेतकऱ्यांनी रात्र आणि दिवस जागून काढला होता. गावाच्या बाहेर बघावे तिकडे पाणीच पाणी पसरलेले होते. रात्री कोणत्याही प्रसंगी पाण्याची पातळी वाढू शकते, या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले होते. त्या महापुराची धास्ती त्यांच्या मनात आजही असल्याचे दिसून आले.

मागील वर्षी भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. तिने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे कुडलसंगम येथे पाणी पातळी कमालीची वाढली आणि सीना नदीतील पाण्याचा भीमा नदीत प्रवाह थांबला. पाणी पुढे जाण्याऐवजी वडकबाळ पुलापासून आजूबाजूला पसरत राहिले. पन्नास हजार एकरांपेक्षा अधिक पिके पाण्याखाली गेली होती. किमान दीड लाख टन ऊस महापुरानंतर पाण्यासोबत वाहून गेला. आजही सीना नदी काठोकाठ भरून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे.

--------

जनावरे सुरक्षित ठिकाणी

गतवर्षी आलेल्या महापुरात शेकडो जनावरे वाहून गेली. अचानक पूर आल्याने जनावरे शेतात आणि शेतकरी गावात अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना चारा पाणी करता आला नाही. सलग तीन दिवस जनावरे दावणीला बांधून राहिली. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यावर भर दिला आहे. काही ठिकाणी भर रस्त्यावर जनावरे बांधल्याचे चित्र दिसून आले.

-------

बिरनाळ ग्रामस्थांना प्रवाह बदलण्याची भीती

सीना नदीने १९७९ साली आलेल्या महापुरात प्रवाह बदलला होता. बिरनाळ गावापासून वाहणारी ही नदी त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेताची बांधे तोडून राजूरच्या दिशेने वाहिली. या महापुरानंतर नदीचे पात्र बदलले होते. मात्र गतवर्षी जुन्या नदीपात्रात पाणी आल्याने संपूर्ण सीना - भीमा परिसरातील पिके जलमय झाली. आता पातळी वाढली तर पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याची भीती बिरनाळ ग्रामस्थांना वाटते.

---------

शेतातील वस्त्या होत आहेत रिकाम्या

बागायत क्षेत्र वाढले आहे त्यामुळे बहुतेक शेतकरी शेतातील वस्तीवर पक्की घरे बांधून राहण्यास गेले आहेत . नदीकाठच्या गावांतील ४० टक्के घरे रिकामी दिसतात. आता महापुराच्या पाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आहे. संसारोपयोगी साहित्यासह शेतातील वस्त्या रिकाम्या करून शेतकऱ्यांनी तूर्तास गावातच राहण्याची तयारी सुरू केली आहे.

---------

मागील वर्षीचा अनुभव खूप भयावह आहे. आम्ही रात्रीची झोप सोडली होती. गाव उंचावर असले तरी घराच्या धाब्यावर उभे राहून आमची पाण्यात बुडालेली शेती पाहताना अश्रूंचा बांधही फुटला होता.

-निसार हमीद अत्तार, शेतकरी, बिरनाळ

(फोटो आहेत)