शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धास्तावला; अति पावसाने सोयाबीनमध्ये दिसताहेत क्लोरोसिसची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:08 IST

शेतकºयांमध्ये चिंता; अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने पिवळी

ठळक मुद्देजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेतलोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे

सोलापूर: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने विक्रमी म्हणजे ५९ हजार ९१८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून, गेल्या आठवडाभरातील अतिपावसाने पाने पिवळी पडू लागल्याने शेतकºयांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली क्लोरोसिसची ही लक्षणे असून, शेतकºयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ३४ हजार ६४१ हेक्टर क्षेत्र आहे. सर्वच नक्षत्राच्या पावसाने गेल्या दहा वर्षांत प्रथमच समाधानकारक हजेरी लावल्याने १४६ टक्के क्षेत्रावर (३ लाख ४२ हजार ३९४ हेक्टर) खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर आणि सोयाबीनच्या पेरणीला शेतकºयांनी महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ तालुक्यात बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके कोमात जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे. 

सोयाबीनला बसू शकतो फटकाजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेत. याच्या कारणांबाबत माहिती देताना कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे म्हणाले, लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. 

हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

शेतात साचलले पाणी सोडाशेतकºयांनी याबाबत चिंता न करता वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, असे आवाहन कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी केले आहे. गरज असेल तर ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूटिएंट ग्रेड ५०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून पानावर फवारावे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी