शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धास्तावला; अति पावसाने सोयाबीनमध्ये दिसताहेत क्लोरोसिसची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:08 IST

शेतकºयांमध्ये चिंता; अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने पिवळी

ठळक मुद्देजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेतलोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे

सोलापूर: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने विक्रमी म्हणजे ५९ हजार ९१८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून, गेल्या आठवडाभरातील अतिपावसाने पाने पिवळी पडू लागल्याने शेतकºयांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली क्लोरोसिसची ही लक्षणे असून, शेतकºयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ३४ हजार ६४१ हेक्टर क्षेत्र आहे. सर्वच नक्षत्राच्या पावसाने गेल्या दहा वर्षांत प्रथमच समाधानकारक हजेरी लावल्याने १४६ टक्के क्षेत्रावर (३ लाख ४२ हजार ३९४ हेक्टर) खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर आणि सोयाबीनच्या पेरणीला शेतकºयांनी महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ तालुक्यात बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके कोमात जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे. 

सोयाबीनला बसू शकतो फटकाजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेत. याच्या कारणांबाबत माहिती देताना कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे म्हणाले, लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. 

हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

शेतात साचलले पाणी सोडाशेतकºयांनी याबाबत चिंता न करता वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, असे आवाहन कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी केले आहे. गरज असेल तर ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूटिएंट ग्रेड ५०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून पानावर फवारावे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी