शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

शेतकरी धास्तावला; अति पावसाने सोयाबीनमध्ये दिसताहेत क्लोरोसिसची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:08 IST

शेतकºयांमध्ये चिंता; अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाने पिवळी

ठळक मुद्देजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेतलोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे

सोलापूर: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने विक्रमी म्हणजे ५९ हजार ९१८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून, गेल्या आठवडाभरातील अतिपावसाने पाने पिवळी पडू लागल्याने शेतकºयांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली क्लोरोसिसची ही लक्षणे असून, शेतकºयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ३४ हजार ६४१ हेक्टर क्षेत्र आहे. सर्वच नक्षत्राच्या पावसाने गेल्या दहा वर्षांत प्रथमच समाधानकारक हजेरी लावल्याने १४६ टक्के क्षेत्रावर (३ लाख ४२ हजार ३९४ हेक्टर) खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर आणि सोयाबीनच्या पेरणीला शेतकºयांनी महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ तालुक्यात बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके कोमात जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे. 

सोयाबीनला बसू शकतो फटकाजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेत. याच्या कारणांबाबत माहिती देताना कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे म्हणाले, लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. 

हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

शेतात साचलले पाणी सोडाशेतकºयांनी याबाबत चिंता न करता वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, असे आवाहन कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी केले आहे. गरज असेल तर ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूटिएंट ग्रेड ५०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून पानावर फवारावे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी