शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य शासनाला अपयश; खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 8:15 AM

पूरग्रस्तांचे लवकर सर्वेक्षण करून सरकारने तातडीने मदत देण्याची केली मागणी

मंगळवेढा : नदीकाठची पूर परिस्थिती या शासनाला हाताळता आली नाही. हवामान खात्याने आगावू सूचना देवून सुद्धा झालेले प्रचंड नुकसान होण्याअगोदर पाण्याचा प्रवाह सोडून थांबवता आले असते. आता सर्व नुकसानग्रस्ताना लवकर सर्वेक्षण करून सरकारने तातडीने मदत द्यावी. पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. 

खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित झालेल्या ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, रहाटेवाडी व तामदर्डी या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मोगले, राजेंद्र सुरवसे, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, तहसीलदार स्वप्निल रावडे, भारत पाटील, राजेंद्र पाटील, सिद्धेश्वर कोकरे, सुरेश जोशी, प्रसाद पवार आदीसह पूरग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. 

खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य म्हणाले की पंतप्रधान सडक योजनेतील मंजूर असलेल्या रहाटेवाडी पुलाच्या रखडलेल्या कामासाठी सुधारित दराप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दौऱ्यात ब्रह्मपुरीत कोकरे यांच्या शेतातील पुरामुळे जळून गेलेल्या कांद्याची भरपाई द्यावी. संजय पाटील यांची गाय दगावली व घरासह धान्याचे झालेले नुकसान भरपाई देण्यासाठी तहसीलदारांना सर्व पंचनामे त्वरित करून भरपाई द्यावी अश्‍या सूचना दिल्या. उचेठाण व बठाण येथील दोन्ही बंधारे बाजूने खचले असून ते कायम स्वरूपी सीमेंट मजबूत करून देण्याची मागणी केल्यावर संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच रहाटेवाडी येथील बाधीत क्षेत्राची पाहणी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊसGovernmentसरकार