शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

सांगोला तालुक्यातील १८ बंधारे कोरडे ठणठणीत, पाण्याची गळती रोखण्यात प्रशासनाला आले अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:46 PM

‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अवघ्या दोन महिन्यातच कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपाण्याची गळती रोखण्यासाठी आलेला ४० लाखांचा शासकीय निधीदेखील पाण्याच्या गळतीबरोबर वाहून गेला की काय? अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी जाणूनबुजून गळतीकडे दुर्लक्ष केल्याने आज नदीकाठच्या गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली गळतीसाठी आलेले ४० लाख रुपये कोणाच्या घशात गेले़ याबाबत संबंधित अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केली आहे़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि २३ : ‘देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने तारले; मात्र अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना पाण्याविना मारले, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माण व कोरडा नदीवरील १८ बंधारे तुडुंब भरुनही अवघ्या दोन महिन्यातच कोरडे पडले आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी आलेला ४० लाखांचा शासकीय निधीदेखील पाण्याच्या गळतीबरोबर वाहून गेला की काय? अशी चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.यंदा परतीच्या पाऊस दमदार झाल्यामुळे ८ वर्षांनंतर सांगोला तालुक्यातून मार्गक्रमण करणाºया माण नदीवरील १६ व कोरडा नदीवरील २ असे एकूण १८ को. प. बंधारे साठवण क्षमतेच्या ८५ टक्के (१.२५० टी.एम.सी.) पाण्याने तुडुंब भरले होते. बंधाºयातील पाणीसाठा टिकून रहावा. पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रशासन व नदी परिसरातील शेतकºयांनी योग्य ती काळजी घेतली होती, परंतु वर्षानुवर्षे त्याच त्या गंजलेल्या दरवाजातून पाण्याची गळती, बंधाºयाच्या दयनीय अवस्थेसह  शेतकºयांकडून होणाºया पाण्याच्या उपशामुळे अवघ्या दोन महिन्यातच बंधारे कोरडे पडले आहेत. वास्तविक बंधाºयातील पाणी टिकून राहणे, गळतीतून पाणी वाया जाऊ नये यासाठी प्रशासनाने सुमारे ४० लाख रुपये खर्चून गळती काढण्याच्या कामावर खर्च केला़ असे असताना अवघ्या दोन महिन्यातच सर्व बंधारे  कोरडे पडले आहेत. यामुळे येत्या उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासनाने निविदा काढून ठेकेदारांकडून गळतीचे काम चोख केले की नाही याची चौकशीसुध्दा करणे गरजेचे आहे. शासन पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते़ तरीही पाण्याची बचत व पाणीसाठा टिकून का राहत नाही याचा हिशोब संबंधित अधिकाºयांकडून घेणे गरजेचे आहे.माण व कोरडा नदीकाठच्या शेतकºयांनी पाण्याची गळती रोखण्यासाठी वेळोवेळी तहसील व पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार संजय पाटील यांनी यातील काही बंधाºयाची पाहणी करुन त्यातून गळती होत असल्याचे पाटबंधारे अधिकाºयाच्या निदर्शनास आणून दिले़ शिवाय संबंधित बंधाºयांच्या तातडीने गळती रोखाव्यात अशा सूचना केल्या होत्या, परंतु पाटबंधारे अधिकाºयांनी तहसीलदार व शेतकºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. परिणामी आज बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. याविषयी संबंधित अधिकाºयाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ----------------------गळतीकडे दुर्लक्ष; अधिकाºयांची चौकशी करा- पाटबंधारे अधिकाºयांनी जाणूनबुजून गळतीकडे दुर्लक्ष केल्याने आज नदीकाठच्या गावांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. मग गळतीसाठी आलेले ४० लाख रुपये कोणाच्या घशात गेले़ याबाबत संबंधित अधिकाºयाची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी