शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चांगलं काम करण्याची उम्मीद...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:07 IST

स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे.

ठळक मुद्देआपल्यापैकी कोणत्याही कार्यक्षम व्यक्तीने अवमानांनी, विरोधाने किंवा छळवादाने घाबरून किंवा गांगरून जाता कामा नयेआपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ काळ काम करावे लागणार

मागील सुमारे वीस वर्षांत अनेक महामानवांच्या व पराक्रमी स्त्री-पुरुषांच्या जीवनचरित्रांचे अध्ययन मी केले आहे. भारतातील केवळ बुद्ध आणि बाबासाहेबच नाही तर महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या भारतीय महापुरुषांसोबतच अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, जॉर्ज कार्व्हर यांसारख्या अनेक पराक्रमी व्यक्तींच्या जीवनचरित्रांचे अथवा जीवनक्रमाचे मी यथाशक्ती अध्ययन केले आहे.

ते करताना मला नेहमी असे जाणवत राहिले आहे की, आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात, हे सर्व महापुरुष अथवा पराक्रमी स्त्री-पुरुष हे तुमच्या माझ्यासारखे किंवा आपल्या सर्वांसारखे अगदी सामान्य मानवच होते. नंतरच्या आयुष्यात मात्र जसजसे विविध गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधले गेले तसतसे त्यांच्या आचारविचारांत, प्राधान्यक्रमांत व जीवनध्येयांत बदल होत गेले. त्या-त्या क्षणी त्यांना जे-जे योग्य वाटले ते-ते साध्य करण्यासाठी जीवनातील इतर सुखांकडे, लोकनिंदेकडे, विरोधांकडे ते दुर्लक्ष करत गेले व जसजसे ते या गोष्टी हळूहळू पण सातत्याने करत गेले तसतसे ते अलौकिक पुरुष बनत गेले. ते चांगले मानव, महापराक्रमी मानव किंवा महामानव बनत गेले.

महापुरुष किंवा पराक्रमी पुरुष बनत असतानाचा हा प्रवास या सर्वांसाठी सारखाच आहे! त्याच्या तपशिलात काही बदल आहेत. पण सुरुवात सारखीच आहे, मध्य सारखाच आहे व अंतही सारखाच आहे. त्यात विशेष असा कोणताही फरक नाही. मागील सुमारे वीस वर्षांत अशा अनेक महामानवांच्या जीवनक्रमाचे मी जसजसे परिशीलन करत गेलो तसतसे त्यांनी आक्रमिलेल्या जीवनपथाविषयी माझ्या मनात मोठे आकर्षण निर्माण होत गेले. आपणही त्यांच्यासारखेच जगावे, असे मला सातत्याने वाटू लागले. ‘माझी डॉक्टरेट’ हे या आणि अशा विचारांनाच आलेले एक अत्यंत परिपक्व फळ आहे, असे मला वाटते.

या दिशेने आजवर मी जे काही केले ते जर माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी केले असते तर कदाचित फार काळ मला या पथावरून चालता आले नसते! पण स्वार्थापेक्षा परमार्थाची भावना प्रबळ असल्यानेच कदाचित मला आजवर समोर आलेल्या अडीअडचणींची, मान-अवमानांची किंवा संकटांची फारशी फिकीर वाटलेली नाही.

आपले नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवण्यापूर्वी कोणालाही या जगाने डोक्यावर उचलून धरलेले नाही की कोणाचाही पुरेसा सन्मान केलेला नाही. त्यामुळेच मला असे वाटते की, आपल्यापैकी कोणत्याही कार्यक्षम व्यक्तीने अवमानांनी, विरोधाने किंवा छळवादाने घाबरून किंवा गांगरून जाता कामा नये. 

आज मला केवळ स्वत:पुरते मर्यादित होऊन जगावे, असे कधीही वाटत नाही. स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे, असे मला नेहमी वाटते. हा विचार अनेक महामानवांच्या जीवन चरित्रांतूनच माझ्या मनात रुजला आहे. आपल्यातला प्रत्येक जण जर इतरांसाठीही थोडाफार झटू लागला तर आयुष्यभर केवळ स्वत:साठीच झटत राहण्याची फारशी गरज कोणाला वाटणार नाही! पण दुर्दैवाने आपल्या समाजात आजवर असे झालेले नाही. मला काही फक्त एकट्यासाठीच कुठला मानमरातब, प्रतिष्ठा किंवा सन्मान मिळवायचा आहे, अशातला भाग नाही. मला काही माझ्या एकट्यासाठीच एखादे विशेष स्वातंत्र्य वगैरे मिळवायचे आहे, अशातलाही भाग नाही!

या सगळ्या गोष्टी तर प्रत्येकालाच मिळाल्या पाहिजेत, या मताचा मी आहे! मला जे काही मिळवायचे आहे ते आपल्या सर्वांसाठीच मिळवायचे आहे. पण ते आपोआप मिळणार नाही, याचीही मला पूर्ण जाणीव आहे. आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ काळ काम करावे लागणार आहे. आपल्याला अत्यंत चांगले काम करावे लागणार आहे आणि सध्यातरी मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील कोट्यवधी गोरगरिबांवर होत असलेल्या सामाजिक अन्यायाचा आणि अनुषंगिक समस्यांचा अभ्यास करून त्या क्षेत्रात मी मिळवलेली ‘डॉक्टरेट’ हे मी त्याच दिशेने टाकलेले एक अत्यंत छोटेसे पाऊल आहे !

- डॉ. रविनंद नामदेव होवाळ(लेखक हे साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा