शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चांगलं काम करण्याची उम्मीद...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:07 IST

स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे.

ठळक मुद्देआपल्यापैकी कोणत्याही कार्यक्षम व्यक्तीने अवमानांनी, विरोधाने किंवा छळवादाने घाबरून किंवा गांगरून जाता कामा नयेआपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ काळ काम करावे लागणार

मागील सुमारे वीस वर्षांत अनेक महामानवांच्या व पराक्रमी स्त्री-पुरुषांच्या जीवनचरित्रांचे अध्ययन मी केले आहे. भारतातील केवळ बुद्ध आणि बाबासाहेबच नाही तर महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या भारतीय महापुरुषांसोबतच अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, जॉर्ज कार्व्हर यांसारख्या अनेक पराक्रमी व्यक्तींच्या जीवनचरित्रांचे अथवा जीवनक्रमाचे मी यथाशक्ती अध्ययन केले आहे.

ते करताना मला नेहमी असे जाणवत राहिले आहे की, आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात, हे सर्व महापुरुष अथवा पराक्रमी स्त्री-पुरुष हे तुमच्या माझ्यासारखे किंवा आपल्या सर्वांसारखे अगदी सामान्य मानवच होते. नंतरच्या आयुष्यात मात्र जसजसे विविध गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधले गेले तसतसे त्यांच्या आचारविचारांत, प्राधान्यक्रमांत व जीवनध्येयांत बदल होत गेले. त्या-त्या क्षणी त्यांना जे-जे योग्य वाटले ते-ते साध्य करण्यासाठी जीवनातील इतर सुखांकडे, लोकनिंदेकडे, विरोधांकडे ते दुर्लक्ष करत गेले व जसजसे ते या गोष्टी हळूहळू पण सातत्याने करत गेले तसतसे ते अलौकिक पुरुष बनत गेले. ते चांगले मानव, महापराक्रमी मानव किंवा महामानव बनत गेले.

महापुरुष किंवा पराक्रमी पुरुष बनत असतानाचा हा प्रवास या सर्वांसाठी सारखाच आहे! त्याच्या तपशिलात काही बदल आहेत. पण सुरुवात सारखीच आहे, मध्य सारखाच आहे व अंतही सारखाच आहे. त्यात विशेष असा कोणताही फरक नाही. मागील सुमारे वीस वर्षांत अशा अनेक महामानवांच्या जीवनक्रमाचे मी जसजसे परिशीलन करत गेलो तसतसे त्यांनी आक्रमिलेल्या जीवनपथाविषयी माझ्या मनात मोठे आकर्षण निर्माण होत गेले. आपणही त्यांच्यासारखेच जगावे, असे मला सातत्याने वाटू लागले. ‘माझी डॉक्टरेट’ हे या आणि अशा विचारांनाच आलेले एक अत्यंत परिपक्व फळ आहे, असे मला वाटते.

या दिशेने आजवर मी जे काही केले ते जर माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी केले असते तर कदाचित फार काळ मला या पथावरून चालता आले नसते! पण स्वार्थापेक्षा परमार्थाची भावना प्रबळ असल्यानेच कदाचित मला आजवर समोर आलेल्या अडीअडचणींची, मान-अवमानांची किंवा संकटांची फारशी फिकीर वाटलेली नाही.

आपले नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवण्यापूर्वी कोणालाही या जगाने डोक्यावर उचलून धरलेले नाही की कोणाचाही पुरेसा सन्मान केलेला नाही. त्यामुळेच मला असे वाटते की, आपल्यापैकी कोणत्याही कार्यक्षम व्यक्तीने अवमानांनी, विरोधाने किंवा छळवादाने घाबरून किंवा गांगरून जाता कामा नये. 

आज मला केवळ स्वत:पुरते मर्यादित होऊन जगावे, असे कधीही वाटत नाही. स्वत:बरोबरच इतरांसाठीही आपण जगले पाहिजे; इतरांसाठीही काही काम केले पाहिजे, असे मला नेहमी वाटते. हा विचार अनेक महामानवांच्या जीवन चरित्रांतूनच माझ्या मनात रुजला आहे. आपल्यातला प्रत्येक जण जर इतरांसाठीही थोडाफार झटू लागला तर आयुष्यभर केवळ स्वत:साठीच झटत राहण्याची फारशी गरज कोणाला वाटणार नाही! पण दुर्दैवाने आपल्या समाजात आजवर असे झालेले नाही. मला काही फक्त एकट्यासाठीच कुठला मानमरातब, प्रतिष्ठा किंवा सन्मान मिळवायचा आहे, अशातला भाग नाही. मला काही माझ्या एकट्यासाठीच एखादे विशेष स्वातंत्र्य वगैरे मिळवायचे आहे, अशातलाही भाग नाही!

या सगळ्या गोष्टी तर प्रत्येकालाच मिळाल्या पाहिजेत, या मताचा मी आहे! मला जे काही मिळवायचे आहे ते आपल्या सर्वांसाठीच मिळवायचे आहे. पण ते आपोआप मिळणार नाही, याचीही मला पूर्ण जाणीव आहे. आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ काळ काम करावे लागणार आहे. आपल्याला अत्यंत चांगले काम करावे लागणार आहे आणि सध्यातरी मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील कोट्यवधी गोरगरिबांवर होत असलेल्या सामाजिक अन्यायाचा आणि अनुषंगिक समस्यांचा अभ्यास करून त्या क्षेत्रात मी मिळवलेली ‘डॉक्टरेट’ हे मी त्याच दिशेने टाकलेले एक अत्यंत छोटेसे पाऊल आहे !

- डॉ. रविनंद नामदेव होवाळ(लेखक हे साहित्यिक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा