शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण कर्ज माफ होईल असं आजही सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना वाटतंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:50 IST

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक : मुदतवाढीनंतरही १० हजार शेतकरी थकबाकी भरेनात..

ठळक मुद्देओटीएसमध्ये पैसे भरण्यासाठी शासनाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली तर त्यांचे खाते कोरे होणार

अरुण बारसकरसोलापूर: संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेवर आजही शेतकरी अवलंबून बसला असून, दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी शेतकरी तयार नाहीत. यामुळे एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेसाठी पात्र असलेल्या ९ हजार ८०१ शेतकºयांनी मुदतवाढ दिल्यानंतरही पैसे भरलेले नाहीत.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना २४ जून २०१६ रोजी जाहीर केली. त्यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, दीड लाखावरील थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारे शेतकरी अशा तीन प्रकारच्या ‘ग्रीन’ याद्या बँकांना पाठविल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३० मे रोजी ९ वी ग्रीन यादी आली होती. या सर्व ९ याद्यांतील दीड लाखापर्यंतच्या ४५ हजार ४६० थकबाकीदारांची २८८ कोटी २० लाख १७ हजार ३५० रु़ रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली. नियमित पैसे भरणाºया ३० हजार ६०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून ५७ कोटी १८ लाख ६० हजार ८७५ रुपये जमा करण्यात आले.

एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेसाठी १६ हजार ९९७ शेतकरी खातेदार पात्र होते. या सर्व शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकलेले आहे. शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन शेतकºयांना केले. शेतकºयांनी कर्जाची दीड लाखावरील रक्कम भरली तरच शासनाकडून दीड लाख रुपये शेतकºयांच्या कर्ज खात्यावर जमा केले जातात. शासनाने अगोदर डिसेंबर १७ नंतर मार्च १८, जून १८ व नंतर ३० सप्टेंबरपर्यंत दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती.

बँकांचा कर्ज वसुलीसाठी जून हा महिना असल्याने शासनाने व बँकेने जून महिन्यात दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी विशेष मोहीम राबवली. दीड लाखावर काही रुपये थकबाकी असणाºयाच शेतकºयांनी ओटीएसमध्ये सहभाग घेतला व रक्कम भरली. ही रक्कमही कर्ज रुपाने पुन्हा देण्याची हमी बँकेच्या अधिकाºयांकडून घेण्यासही शेतकरी विसरले नाहीत.

ओटीएससाठी पात्र असलेल्या १६ हजार ९९७ शेतकºयांपैकी ७ हजार १९६ शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली असून, ९ हजार ८०१ शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. बँक व विकास सोसायटीचे सचिव दीड लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकºयांकडे येरझºया करतात, त्यावेळी सरकार सर्वच कर्ज माफ करणार असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे दीड लाखावरील थकबाकीदारांची बाकी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

तीन महिन्यांत अवघे ४८२ शेतकरी...- जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ४८२ शेतकºयांनी ओटीएस योजनेत दीड लाखावरील कर्ज भरले. या शेतकºयांकडे दीड लाखावर अवघी काही रक्कमच थकबाकी होती.  १० हजार २८३ शेतकरी ओटीएससाठी पात्र असताना केवळ               ४८२ शेतकरी पैसे भरण्यासाठी पुढे आले. 

ओटीएसमध्ये पैसे भरण्यासाठी शासनाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली तर त्यांचे खाते कोरे होणार आहे. पीक असेल तर नव्याने कर्ज मिळेल.- शैलेश कोतमिरेप्रशासक, जिल्हा बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरीagricultureशेती