शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

पूर्ण कर्ज माफ होईल असं आजही सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना वाटतंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:50 IST

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक : मुदतवाढीनंतरही १० हजार शेतकरी थकबाकी भरेनात..

ठळक मुद्देओटीएसमध्ये पैसे भरण्यासाठी शासनाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली तर त्यांचे खाते कोरे होणार

अरुण बारसकरसोलापूर: संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेवर आजही शेतकरी अवलंबून बसला असून, दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी शेतकरी तयार नाहीत. यामुळे एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेसाठी पात्र असलेल्या ९ हजार ८०१ शेतकºयांनी मुदतवाढ दिल्यानंतरही पैसे भरलेले नाहीत.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना २४ जून २०१६ रोजी जाहीर केली. त्यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, दीड लाखावरील थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारे शेतकरी अशा तीन प्रकारच्या ‘ग्रीन’ याद्या बँकांना पाठविल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३० मे रोजी ९ वी ग्रीन यादी आली होती. या सर्व ९ याद्यांतील दीड लाखापर्यंतच्या ४५ हजार ४६० थकबाकीदारांची २८८ कोटी २० लाख १७ हजार ३५० रु़ रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली. नियमित पैसे भरणाºया ३० हजार ६०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून ५७ कोटी १८ लाख ६० हजार ८७५ रुपये जमा करण्यात आले.

एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेसाठी १६ हजार ९९७ शेतकरी खातेदार पात्र होते. या सर्व शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकलेले आहे. शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन शेतकºयांना केले. शेतकºयांनी कर्जाची दीड लाखावरील रक्कम भरली तरच शासनाकडून दीड लाख रुपये शेतकºयांच्या कर्ज खात्यावर जमा केले जातात. शासनाने अगोदर डिसेंबर १७ नंतर मार्च १८, जून १८ व नंतर ३० सप्टेंबरपर्यंत दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती.

बँकांचा कर्ज वसुलीसाठी जून हा महिना असल्याने शासनाने व बँकेने जून महिन्यात दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी विशेष मोहीम राबवली. दीड लाखावर काही रुपये थकबाकी असणाºयाच शेतकºयांनी ओटीएसमध्ये सहभाग घेतला व रक्कम भरली. ही रक्कमही कर्ज रुपाने पुन्हा देण्याची हमी बँकेच्या अधिकाºयांकडून घेण्यासही शेतकरी विसरले नाहीत.

ओटीएससाठी पात्र असलेल्या १६ हजार ९९७ शेतकºयांपैकी ७ हजार १९६ शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली असून, ९ हजार ८०१ शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. बँक व विकास सोसायटीचे सचिव दीड लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकºयांकडे येरझºया करतात, त्यावेळी सरकार सर्वच कर्ज माफ करणार असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे दीड लाखावरील थकबाकीदारांची बाकी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

तीन महिन्यांत अवघे ४८२ शेतकरी...- जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ४८२ शेतकºयांनी ओटीएस योजनेत दीड लाखावरील कर्ज भरले. या शेतकºयांकडे दीड लाखावर अवघी काही रक्कमच थकबाकी होती.  १० हजार २८३ शेतकरी ओटीएससाठी पात्र असताना केवळ               ४८२ शेतकरी पैसे भरण्यासाठी पुढे आले. 

ओटीएसमध्ये पैसे भरण्यासाठी शासनाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली तर त्यांचे खाते कोरे होणार आहे. पीक असेल तर नव्याने कर्ज मिळेल.- शैलेश कोतमिरेप्रशासक, जिल्हा बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरीagricultureशेती